Khandesh Dam Water Storage : खानदेशातील प्रकल्पांत जलसाठा कमी

Khandesh Dam Water Level Update : अनेक प्रकल्प भरण्याची प्रतीक्षा; एकूण जलसाठा २९ टक्क्यांवर
Dam Water Storage
Dam Water StorageAgrowon
Published on
Updated on

Khandesh Dam Water News : जळगाव : खानदेशात जलसाठा कमी असून, अनेक मोठे व मध्यम प्रकल्प भरण्याची प्रतीक्षा आहे. एकूण जलसाठा किंचित वाढला असून, तो २९ टक्के एवढा आहे.

खानदेशात गिरणा नदीवर गिरणा, तापीवरील हतनूर, वाघूर नदीवरील वाघूर, रावेरात अभोरा, मंगरूळ, सुकी, गारबर्डी (लघू प्रकल्प), जामनेरातील तोंडापूर, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती, चाळीसगावमधील मन्याड, एरंडोलातील अंजनी, पारोळ्यातील बोरी, यावलमधील मोर, चोपड्यातील गूळ, नंदुरबारात सुसरी, दरा, देहली, धुळ्यात पांझरा नदीवरील पांझरा, शिरपुरातील अनेर, धुळ्यातील सोनवद, अमरावती, बुराई आदी प्रकल्प महत्त्वाचे आहेत. यातील काही प्रकल्प भरले आहेत. त्यात रावेर व यावलमधील सर्व प्रकल्प भरले आहेत.

अनेर प्रकल्पांचा साठाही बऱ्यापैकी आहे. हतनूर प्रकल्पातून तापी नदीत विसर्ग सुरूच आहे. प्रकल्पातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू आहे. हा प्रकल्प १०० टक्के भरेल, पण त्यात ५४ टक्के गाळ आहे. गिरणा, वाघूर, तोंडापूर, अंजनी, मन्याड, बहुळा, बोरी, भोकरबारी, धुळ्यातील पांझरा वगळता इतर प्रकल्प भरलेले नाहीत. नंदुरबारात देहली व दरा प्रकल्प वगळता इतर प्रकल्प १०० टक्के भरलेले नाहीत.

मागील वर्षी खानदेशात १० ऑगस्टपर्यंत कमाल प्रकल्प भरले होते. परंतु यंदा कमाल प्रकल्प रिकामे आहेत. जळगावच्या पश्‍चिम भागात किंवा गिरणा पट्ट्यात अनेक प्रकल्प तळ गाठत आहेत. शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. वाघूर प्रकल्पातून जळगाव, जामनेर शहर व काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच भुसावळ, जळगावमधील रब्बीलाही पाणी दिले जाते. परंतु या प्रकल्पातील जलसाठा ५६ टक्केच आहे. गिरणा धरण १८ टीएमसी क्षमतेचे आहे. मागील चार वर्षे हे धरण १०० टक्के भरले आहे. त्यातून १०० पेक्षा अधिक गावे, नाशिकमधील मनमाड, जळगावमधील पाचोरा, चाळीसगाव व भडगाव शहरासही पाणी दिले जाते. तसेच २१ हजार हेक्टरवरील रब्बीलाही लाभ होतो. परंतु त्यातील जलसाठा फक्त ३४ टक्के आहे.

Dam Water Storage
Water Stock : मे महिन्यातही प्रकल्पांत ४३ टक्के जलसाठा

अर्धा पावसाळा संपला आहे, पण या महत्त्वाच्या प्रकल्पांमधील जलसाठा वाढलेला नसल्याने किंवा हवा तेवढा जलसाठा नसल्याने चिंता आहे. हतनूर प्रकल्प १०० टक्के भरतो, पण त्यात गाळ निम्मेपेक्षा अधिक आहे. सुमारे नऊ टीएमसी एवढी त्याची साठवण क्षमता आहे. पण निम्मेच जलसाठा क्षमता असल्याने त्यातील पाणी एप्रिलअखेरपर्यंत रिकामे होते.

पावसाला जोरच नाही

पाऊस तब्बल महिनाभर सुरू आहे. परंतु रिपरिप किंवा हलका पाऊस सर्वच भागात झाला. जोरदार पाऊस अपवाद वगळता किंवा फक्त सातपुडा पर्वतात झाला. यामुळे या भागातील जलसाठे मुबलक दिसत आहेत. परंतु इतरत्र जोरदार पाऊस न झाल्याने प्रकल्प रिकामे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com