K. Chandrashekar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर; कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

BRS Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के. चंद्रशेखर राव हे कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आले आहेत.
K. Chandrasekhar Rao
K. Chandrasekhar RaoAgrowon

Maharashtra Political News : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के. चंद्रशेखर राव हे कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते थेट सांगली जिल्ह्यातील आण्णा भाऊ साठे यांच्या जन्म गावी वाटेगावमध्ये गेले.

यावेळी मुख्यमंत्री राव यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. इस्लामपूर येथील पेठ नाका ते केदारवाडी भाटवाडी, काळमवाडीमार्गे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा ताफा वाटेगावमध्ये दाखल झाला.

सभेच्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करत "चंद्रशेखर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा उत्साहात घोषणा दिल्या. यावेळी के. चंद्रशेखर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन केले.

पुढे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म घराची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर मुंबई ते वाटेगावपासून मुंबईपर्यंत त्यांचा जीवन प्रवास या शिल्पसृष्टी उभे केलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या शिल्पसृष्टीची त्यांनी पाहणी केली.

अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबाई साठे, सचिन साठे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री राव यांना वाटेगावात आल्यावर त्यांना पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. कोल्हापूर मध्ये आल्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय.

K. Chandrasekhar Rao
K. Chandrasekhar Rao : जनता सोन्याच्या विटा नाही, पाणी मागतेय; के. चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्र सरकारवर घणाघात

महाराष्ट्राला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी भारत राष्ट्र समितीच्या विचारास पूरक राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी काल (ता.३१) सांगितले होते. भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याबाबत मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

मागच्या महिन्यात के. चंद्रशेखरराव हे पंढरपूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचे बोलले जाते. यावर केसीआर म्हणाले की, केसीआरला भाजपची ए टीम, बी टीम असे बोलतात, पण मी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील लोकांना सांगतो की, बीआरएस कोणाचीही टीम नाही, आमचा स्वतःचा पक्ष आहे.

आम्हाला कोणाची ए टीम अथवा बी टीम बनण्याची गरज नाही. आम्ही शेतकऱ्यांची टीम आहोत, देशात ७० कोटी शेतकरी आहेत, हे सर्व शेतकरी बीआरएस सोबत आहेत, अशा शब्दात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या विरोधकांना दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com