
Sugarcane Crop : सांगली ः जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा काठाची ओळख ऊसपट्टा अशी आहे. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी पट्ट्यात उपसा सिंचन योजनेमुळे शाश्वत पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांसह दुष्काळी तालुक्यातील शेतकरी ऊस लागवडीसाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गाळपास जाणाऱ्या उसाच्या क्षेत्रात २० हजार हेक्टर क्षेत्रात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात तब्बल ५५ टक्क्यांनी उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठासह दुष्काळी पट्ट्यात उसाचे क्षेत्र वाढत आहेत. दुष्काळी भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि आरफळ योजना सुरू आहेत. या योजनेतून वर्षातून तीन आवर्तने सोडली जातात. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेती पाण्याखाली आली आहे. शाश्वत पाण्याची सोय झाल्याने आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ आणि जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे वाढला आहे. त्यामुळे या तालुक्यातही उसाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात मॉन्सूनचा पाऊस चांगला झाला. परतीचाही पावसाने दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे भूजपातळीत वाढ झाली. यासाऱ्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी ऊस लागवड करण्यासाठी पुढे आले आहेत. २०२१-२२ पासून जिल्ह्यात दरवर्षी २० हजार हेक्टरने क्षेत्र वाढ आहेत. यंदा १ लाख ४४ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळप होणार आहे. त्यापैकी सर्वाधिक उसाचे क्षेत्र वाळवा तालुक्यात आहे. जत तालुक्यात ११ हजार ६५७ हेक्टरवरील उस गाळपास जाणार आहे. आटपाडी, कवठे महांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही उसाचे क्षेत्र वाढले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.