
Washim News मंगरूळपीर तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. या तालुक्यातील तपोवन येथे दिडशे एकरावर शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केलेली असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. शेतकऱ्यांना मदत दिली जावी अशी मागणी तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठवत केली.
प्रशासनाने दखल का घेतली नाही, असा प्रश्न तपोवन येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदारांजवळ केला. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशा मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली.
यावेळी नीलेश येवले, संदीप येवले, दिलीप येवले, उमेश येवले, डिगांबर बाईस्कार, महेश येवले, अमोल येवले, रोशन येवले, योगेश येवले, संतोष येवले, गजानन बाईस्कार, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन सुर्वे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.