Farmer Compensation : शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही

कांदा, भाजीपालासह इतर शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Nasik News
Nasik News Agrowon

Nashik News : कांदा, भाजीपालासह इतर शेतीमालाला कवडीमोल भाव (Agriculture Produce Rate) मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

त्यात पुन्हा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच गॅस, पेट्रोल डिझेलच्या होत असलेल्या दरवाढीमुळे महागाई (Inflation) प्रचंड वाढल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहे.

त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करत जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला.

शेतीमालाला हमीभाव मिळण्यासोबत महागाईच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवार (ता. १०) माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

Nasik News
Mango Crop Damage : आंबा, काजू पिकांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान

या वेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार, आमदार दिलीप बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी आमदार संजय चव्हाण, राज्य महिला आयोग सदस्या दीपिका चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुजबळ पुढे म्हणाले, की कांद्याला कवडीमोल भाव मिळत असून, यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चदेखील निघत नाही. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा शेतकऱ्यांनी कांद्याची होळी केली.

Nasik News
Grape Crop Damage : पूर्व भागात द्राक्षबागा, गहू, हरभऱ्याचे नुकसान

भाजीपाला व इतर शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतीपिकांवर नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

त्यात अवकाळीचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले असून द्राक्ष, कांदा, गहू, भाजीपाला, हरभऱ्यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने चांदवड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. उत्पादनखर्च देखील वसूल होत नसल्याने सरकारने यात तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला २५०० रुपये हमीभाव, तसेच अन्य भाजीपाल्याचेही भाव पडल्याने सर्व शेतपिकांना हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com