
Kolhapur Monsoon News: कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून पाऊस थांबला आहे. दरम्यान काल (ता.११) मंगळवारी पावसाने पूर्णच उघडीप दिली. कोल्हापूर शहर आणि परिसरात तर दिवसभर उन पडले होते. यामुळे काही अंशी उष्मा वाढला होता.
मागच्या चार दिवसांपासून थांबलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. तर पंचगंगा नदीवरील राजाराम, रूई तर भोगावती नदीवरील हळदी आणि कोगे बंधाऱ्यावरील पाणी पातळी कमी झाल्याने हे बंधारे खुले झाले आहेत.
दरम्यान मागच्या २४ तासांत एक मि.मी. इतक्या पावसाचीही नोंद झालेली नाही. शहर परिसरात पावसाची एखाद-दुसरी सर कोसळली. याचबरोबर तालुक्यांमध्येही पावसाची पूर्ण उघडीप दिली आहे. यामुळे आजच्या पावसाची आकडेवारी निरंक असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
पाऊस थांबल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत असून दुपारी १६ फुटांपर्यंत पातळी कमी झाली. यामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधारा खुला झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. इचलकरंजी येथील रूई बंधाऱ्यावरील पाणीही ओसरले आहे.
भोगावती नदीवरील कोगे बंधारा खुला झाल्याने त्यावरील वाहतूकही सुरू झाली. जिल्ह्यात सध्या पाच बंधारे पाण्याखाली आहेत दरम्यान दोन दिवसात पाऊस झाला नाहीतर नद्यांची पाणी पातळी आणखी खाली जाऊ शकते.
याचबरोबर जिल्ह्यातील भात क्षेत्र तालुके असलेल्या चंदगड, राधानगरी, आजरा, गारगोटी, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यातही पावसाने पाठ फिरवल्याने भात लावणीच्या कामाला ब्रेक मिळाला आहे. दरम्यान पुढच्या काही दिवसांत पाऊस झाला नाहीतर शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.