
Sindhudurg News : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही मोबाइल रेंजची सोय उपलब्ध नाही. त्यातच आंबा, काजूची दरवर्षी ई-पीकपाहणी नोंदणी करण्यास सांगितले जात आहे. मात्र ही सर्व प्रकिया पूर्ण करताना आंबा, काजू बागायतदार मेटाकुटीला येत आहेत.
त्यामुळे आंबा, काजूसह फळझाडांची ई-पीकपाहणी पाच वर्षांनी करण्यात यावी, अशी मागणी कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. हवामानावर आधारित पीकविमा, शासनाकडून दिली जाणारी नुकसानभरपाई यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीकपाहणी नोंदणीची आवश्यकता असते.
मात्र आंबा, काजू लागवड केल्यानंतर फार मोठे बदल तीन-चार वर्षांत होत नाहीत. त्यामुळे आंबा, काजू आणि जिल्ह्यात महत्त्वाची फळपिकांची दरवर्षी ई-पीकपाहणी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
एकीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रेंजची उपलब्धता नाही आणि दुसरीकडे ऑनलाइन ई-पीकपाहणी करण्यास सांगणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करीत कणकवली तालुक्यातील आंबा, काजू बागायतदारांनी तहसीलदारांकडे पाच वर्षांनीच आंबा, काजू ई-पीकपाहणी नोंदणी करावी, अशी मागणी केली आहे. तशा प्रकारचे लेखी निवेदन तहसीलदार दीक्षान्त देशपांडे यांच्याकडे देण्यात आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.