Kolhapur Rain : कोल्हापुरात पावसाची उघडीप, शेकडो हेक्टरवरील शेती पिकांविना राहण्याची भिती

Rain in Kolhapur : मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून उसंत घेतली आहे.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Kolhapur Rain Update : मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून उसंत घेतली आहे. दरम्यान हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. यामुळे पावसाचा जोर वाढला होता परंतु अचानक थांबलेल्या पावसाचा थेट परिणाम शेती पिकांवर होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील शेती पिकांविना राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या धरण क्षेत्रातही पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. दरम्यान मागच्या ८ दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. परंतु पाऊस कमी झाल्याने नद्याची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे.

काल (ता.०९) सायंकाळी चार वाजता २१.३ फुटांवर असणारी पंचगंगेची पातळी रात्री ८ वाजता २१ फुटांपर्यंत आली आहे. घाट माथ्यावर अधूनमधून पडणारी सर वगळता जिल्ह्यातील पूर्व भागात दिवसभर पाऊस झाला नाही. तर काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले.

कोल्हापूर जिल्ह्यात काल भोगावती नदीवरील हळदी बंधाराही पाण्याखाली गेला. यापूर्वी कोगे बंधारा पाण्याखाली गेल्याने कोगे - बहिरेश्वर वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. पंचगंगेवरील सात असे एकूण नऊ बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान पाऊस थांबल्याने भात शेतीसोबत अनेक पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास भात पिकावर रोगांचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे.

दरम्यान मागील २४ तासांपासून पाऊस कमी झाला असला तरी मागच्या ४ दिवसांत झालेल्या पावसाने धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणांत पाणीसाठा वाढला आहे.

Rain
Rain Update : पूर्व विदर्भात पावसाचा जोर

कोल्हापूर जिल्ह्यातील कोदे परिसरात १४०, पाटगाव परिसरात १०९, घटप्रभा धरण क्षेत्रात १०२ मि.मी. पाऊस झाला. राधानगरीत ९२, दूधगंगा ६५ तर कुंभी धरण क्षेत्रात ६५ मि.मी. पाऊस झाला.

तर कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी १५ मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ५७.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरीत ३१.८, भुदरगड २२.२, शाहूवाडी २१.४, आजरा १८.९, चंदगडमध्ये १६. ६ तर पन्हाळा आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी १५.१ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 94.30 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com