
Maharashtra State Government : राज्य सरकारकडून मंत्रीमंडळ बैठक घेण्यात आली यामध्ये राज्यातील पावसासह पिकांच्या पेरण्याच्या परिस्थितीवर आढावा घेण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांनी महसूलसह अन्य विभागांना विविध सूचना केल्या. यामध्ये प्रामुख्यांनी दुबार पेरणी व पाणी टंचाईच्या मुद्यावर चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, यंदा सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी सरासरीच्या १२२.८ टक्के पाऊस झाला होता. पुढील काही दिवसात हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याअनुषंगाने कृषी तसेच महसूल व संबंधित विभागांनी नियोजन करावे तसेच चारा, वैरण, पिण्याचे पाणी या अनुषंगाने योग्य ते नियोजन तयार ठेवावे अशा सूचना दिल्या.
याचबरोबर राज्यातील खरीप पेरणीच्या अनुषंगाने कृषी विभागाने माहिती दिली. यामध्ये राज्यात १३९.५ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९१ टक्के पेरणी झाली आहे.
१०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले ६ जिल्हे असून, ७५ ते १०० टक्के पाऊस झालेले १३ जिल्हे आणि ५० ते ७५ टक्के पाऊस झालेले १५ जिल्हे आहेत. राज्यात १३ ते ५० टक्के पाऊस झालेले १३ तालुके असल्याची त्यांनी माहिती दिली.
सध्या राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात ६१.९० टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ८०.९० टक्के पाणी साठा होता. नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या ७०.४७ टक्के, अमरावती ६६.५७ टक्के.
औरंगाबाद ३१.६५ टक्के, नाशिक ५७.१६ टक्के, पुणे ६८.२३ टक्के आणि कोकण ८७.२५ टक्के अशी पाणी साठ्याची स्थिती आहे. सध्या राज्यात ३२९ गावे आणि १२७३ वाड्यांमधून ३५१ टँकर्स सुरु आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.