
Chhatrapati Sambhaji Nagar वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे (Hailstorm) झालेल्या नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) करण्यासाठी तलाठी व कृषी विभागाचा कोणताही अधिकारी आला नाही. त्यामुळे विहामंडवा येथील एका संतप्त शेतकऱ्याने आपल्या दोन हेक्टर शेतातील टरबूज पीक उपटून फेकले.
विहामांडवा येथील शेतकरी गणेश कृष्णा गोरे यांनी अडीच लाख रुपये खर्च करून दोन हेक्टर शेतामध्ये टरबूज पीक लावले. गारपीट आणि वादळी पावसामुळे टरबूज पिकाचे मोठे नुकसान झाले.
त्यामुळे हवालदिल झालेले गोरे सकाळी सहा वाजल्यापासून तलाठ्यांना फोन करत होता. मात्र त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. संध्याकाळी चार वाजेपर्यंत शेतात पंचनाम्यासाठी कोणताही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे गोरे यांनी शेतामधील संपूर्ण टरबूज पीक उपटून फेकले.
गारपिटीनंतर प्रशासनाने किमान सहानुभूती तरी दाखवायला हवी होती. शेतामध्ये कोणीही अधिकारी आला नाही. तलाठ्यांना फोन लावला असता कृषी सहायकांबरोबर येतो, मग फोटो काढू, असे उत्तर दिले. चार वाजेपर्यंतही अधिकारी येथे आला नाही. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावेत. मदत द्यावी.
- गणेश कृष्णा गोरे, नुकसानग्रस्त शेतकरी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.