Mahad News : कोतुर्डे धरणाची पातळी खालावल्याने शहराला पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. १५ जूनपर्यंत पाण्याचा साठा पुरण्याची शक्यता कमी असल्याने अनेक भागात दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी याबाबत शहरात जाहीर सूचना व दवंडी पिटवली आहे.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महाड नगरपालिकेने नियोजन केले होते. परंतु वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. शहराला कुर्ले, कोतुर्डे व एमआयडीसीतून पाणीपुरवठा होतो. कोतुर्डे धरणातून थेट जलवाहिनीतून शहरात पाणी आणण्यात आले असून बहुसंख्य भागाला याच धरणाचे पाणी पुरवले जाते.
धरणातून जलवाहिनीद्वारे शहराला पुरवठा केला जाते. हा पुरवठा अनियमित आणि कमी दाबाने असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यात गुरुवारपासून (ता.१८) शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
सुलतान गल्ली, सरेकर आळी, काजळपूरा, दस्तुरी नाका, चवदार तळे, गोमुखी आळी, कोटेश्वरी तळे, भीमनगर व देशमुख मोहल्ला येथे शुक्रवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा होईल. तर काकरतळे, इंगवले रोड, रोहिदास नगर, वीरेश्वर आवाड, प्रभात कॉलनी, जवाहर कॉलनी, तांबड भुवन परिसर येथे शनिवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.