Maharashtra Dams Condition : राज्यातील धरणे अद्यापही २५ टक्क्यांखाली, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याची भयावह अवस्था

Maharashtra Rain : जुलै महिन्याचा मध्य उलटून गेला तरी म्हणावा तसा नसल्याने राज्यातील धरणांमध्ये केवळ ३२ टक्के पाणीसाठा आहे.
Maharashtra Dams Condition
Maharashtra Dams Conditionagrowon

Maharashtra Rain Condition : राज्यातील अनेक जिल्ह्यात अद्यापही पावसाने म्हणावी तशी सुरूवात केली नसल्याने अनेक ठिकाणी पेरण्या न झालेली शेती तशीच पडून आहे. हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी समाधान कारक पाऊस नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्यातील कतामी पावसामुळे धरणातील पाणी पातळीतही वाढ संथ गतीने होत आहे.

जुलै महिन्याचा मध्य उलटून गेला तरी म्हणावा तसा नसल्याने राज्यातील धरणांमध्ये केवळ ३२ टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान याचा सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला बसण्याची शक्यता आहे. या दोन विभागात अद्याप २५ टक्क्यांपेक्षा कमी धरणांत पाणीसाठा जमा झाला आहे.

याचबरोबर राज्यातील ११ धरणांचा मृतसाठा जसाच्या तसाच असल्याने भिती व्यक्त केली जात आहे. तर अनेक धरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा निम्म्यावर असल्याने ऑगस्ट अखेर अनेक धरणे ५० टक्के भरतील का याची शंका आहे.

राज्यात जून अखेर धरणांमध्ये १९ टक्के पाणीसाठा होता. यानंतर २० दिवसांत फक्त १३ टक्के पाणीसाठा वाढला आहे. गेल्यावर्षी याच दिवसात राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून जवळपास ६० टक्के पाणीसाठा होता, सध्याचे प्रमाण त्याच्या निम्म्याने आहे.

Maharashtra Dams Condition
Ratnagiri Dam Water : नातूवाडी, शिरवली, पिंपळवाडी धरणे भरली

उजनी धरणाची स्थिती भयानक

मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या उजनी धरणामधील पाण्याने तळ गाठला आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या कोयना धरणातही सध्या २५ टक्के म्हणजे केवळ २४.३६ टीएमसी पाठीसाठा आहे.नागपूर विभागात पाणीसाठ्याची अवस्था चांगली नसली तरी समाधानकारक आहे.

इथे सध्या जवळपास ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. कोकण विभागातही ५६.६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. अमरावती विभागातही बऱ्यापैकी म्हणजे 43 टक्के पाणीसाठा झाला आहे.

Maharashtra Dams Condition
Koyana Dam Rain : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, महाबळेश्वरमध्ये संततधार

महाराष्ट्रातील धरणांत अत्यंत कमी साठा

मिळालेल्या माहितीनुसार, मात्र औरंगाबाद विभागात २४.८२ टक्के, नाशिक विभागात ३२ टक्के आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये केवळ २२.४९ टक्के पाणीसाठा झालेला आहे. सर्वात पाणीदार समजल्या जाणाच्या पश्चिम महाराष्ट्राची सध्याची अवस्था मात्र चिंताजनक आहे.

राज्यातील उजनी, घोड, पिंपळगाव, जोगे, सिरसगाव, करसा, पोहरेगाव, कोळेगाव, लिंबाळा, सिद्धेश्वर, सिरसमार्ग, बोरगाव अंजनपूर आणि खडकपूर्णा ही धरणे कोरडी पडली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com