
परभणी ः परभणी जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२० आणि रब्बी हंगाम २०२०-२१ मधील सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यांतील ८४ हजार ६९३ शेतकऱ्यांचा विविध पिकांची मिळून एकूण ६१ कोटी १५ लाख रुपये एवढी पीकविमा परतावा प्रलंबित आहे. खरीप हंगाम (Kharif Season) २०२० मधील सोयाबीन (Soybean) आणि तूर (Tur) मिळून एकूण ७२ हजार ३९३ शेतकऱ्यांच्या ३० हजार ६१६ हेक्टरवरील पिकांचा ५५ कोटी १० लाख रुपये आणि रब्बी हंगाम (Rabi Season) २०२०-२१ मधील ज्वारीचा १२ हजार ३०० शेतकऱ्यांच्या ६ कोटी ५ लाख रुपये पीकविमा परतावा प्रलंबित आहे. खरीप हंगाम २०२० मधील सोयाबीनचा शेळगाव (ता. सोनपेठ) मंडलातील ३ हजार ४९५ शेतकऱ्यांचा ६ कोटी ५८ लाख रुपये, पिंपळदरी (ता. गंगाखेड) मंडलातील ९ हजार ७२३ शेतकऱ्यांचा १३ कोटी ३८ लाख रुपये विमा परताव्याचा समावेश आहे. तूर पिकाचा पालम तालुक्यातील पालम, बनवस, चाटोरी, रावराजूर, पेठशिवणी मंडलातील ६ हजार ४६६ हेक्टर क्षेत्राचा १८ कोटी १७ लाख रुपये, गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव, पिंपळदरी, गंगाखेड या मंडलांतील ४ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राचा ११ कोटी ५१ लाख रुपये विमा परतावा प्रलंबित आहे.
रब्बी हंगाम २०२०-२१ मधील ज्वारीचा पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा परतावा प्रलंबित आहे. त्यात रावराजूर मंडलातील १ हजार ३५९ शेतकऱ्यांचा १ कोटी ३९ लाख रुपये, बनवस मंडलातील १ हजार ३६४ शेतकऱ्यांचा १ कोटी विमा परताव्याचा समावेश आहे. . त्यामुळे पीकविम्याची थकीत रक्कम १२ टक्के व्याजासह मिळावा यासाठी अॅड. अजित काळे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठात याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती याचिकाकर्ते संघटनेचे तालुकाध्यक्ष (सोनपेठ) विश्वंभर गोरवे, हेमचंद्र शिंदे, माधव घून्नर यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.