Indian Agriculture पुसद, जि. यवतमाळ ः शेतकऱ्यांना शेतमालाचे हमीभाव (MSP) मिळत नाही, शेतकऱ्यांना व्यापारी लुटतो आहे. हा विद्रूपपणा आजही कायम आहे. केंद्र व राज्य सरकारने सक्षमपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. शेतकरी हमीभाव, सिंचनासाठी (Agriculture Irrigation) पाणी मागतो आहे.
ते मिळाल्यास खेड्यातील दारिद्र्य दूर होईल. कृषी आणि कृषी संस्कृती उभी राहिल्यास देश समृद्ध होईल, अशी भूमिका महाराष्ट्राचे नामवंत निसर्गकवी व प्रयोगशील शेतकरी ना. धों. महानोर यांनी मांडली.
पुसद येथे कौटुंबिक कार्यक्रमाकरिता प्रसिद्ध साहित्यिक ना. धों. महानोर आले असता ‘ॲग्रोवन’शी संवाद साधताना ते बोलत होते.शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने आत्महत्या करतो, ही बाब दुर्दैवी आहे. संसदेत तसेच राज्य विधिमंडळात यावर चर्चाही होते.
मात्र लोकप्रतिनिधींचा शेतीशी संबंध नसल्याने, शेती प्रश्नावर खोलवर विचार होत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न आजही कायम आहेत. पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री व एक चतुर्थांश लोक सक्षम पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणारे असावेत.
तरच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील. स्वातंत्र्यानंतर पाण्याच्या संदर्भात यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील या नेत्यांनी योग्य निर्णय घेतले. मात्र, बदलत्या काळात राज्य प्रमुखांना शेतीविषयक आस्था नव्हती.
धरसोडीच्या धोरणामुळे शेती प्रश्नांचा जाळ विझू शकला नाही. शासनाने इतर योजनांवरील पैसा कमी करावा व तो जास्तीत जास्त शेतीत टाकावा, शेतीसाठी कितीही कर्ज काढा, अशी मौलिक सूचना त्यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.