ॲग्रोवन वृत्तसेवा
यवतमाळ : शेतकरी, (Farmer) वाढती महागाई तसेच बेरोजगारीच्या मुद्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. तसेच यवतमाळच्या पालिका मुख्याधिकाऱ्यांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी विविध संघटना व आदिवासी समाजबांधवांनी मोर्चा (Strike) काढला.
यवतमाळ, दारव्हा, राळेगाव तालुक्यांत काँग्रेसने बैलबंडी, ट्रॅक्टर मोर्चा काढत तहसील कार्यालयावर धडक दिली. भर पावसात निघालेल्या यवतमाळ येथील मोर्चात मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असतानाही केंद्र शासनाने मदत दिलेली नाही. राज्य शासनाने तुटपुंजी मदत जाहीर केली. तीसुद्धा अद्याप पोहोचलेली नाही. घरकुलांची योजना सुरू असली तरी घरकुल योजनेतील जाचक अटींमुळे लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहे. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी, पेट्रोल-डिझेल दरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती या सोबतच बेरोजगारी अशा प्रश्नांवर तोडगा काढण्यात केंद्र शासन अपयशी ठरल्याचा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे. या विरोधात केंद्र तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने जिल्हाभरात बैलबंडी तसेच ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.