
Sindhudurg News सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १३) सायकांळी पावसाचे वातावरण (Rainy Weather) निर्माण झाले होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती.
दरम्यान हवामान विभागाने (Weather Update) जिल्ह्यात १६ आणि १७ मार्चला विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज (Rain Forecast) दिला आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे.
जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. वाऱ्याची गतीदेखील वाढली होती. पावसाच्या शक्यतेने काढणी केलेल्या पिकांची आवराआवर शेतकऱ्यांनी सुरू केली.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागांत हलका तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे आंबा आणि काजू या दोनही पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात १६ आणि १७ मार्चला मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय वारादेखील ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणार आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या आंब्याची बागायतदारांनी येत्या दोन दिवसांत काढणी करून संभाव्य नुकसान टाळावे. याशिवाय अन्य हानी टाळण्यासाठी ‘दामिनी ॲप’चा वापर करावा.
- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.