यवतमाळ ः बाजार समित्यांमध्ये (Market committee) शेतमाल खरेदीची (Agril. Produce) सुविधा असतानाही थेट शेतमाल खरेदीचे परवाने दिले जात आहेत. अशा खेडा खरेदीदारांनी नजीकच्या काळात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर येत असल्याने हे परवाने रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहायक निबंधक, जिल्हाधिकारी, दारव्हा बाजार समितीचे प्रशासकांना या संदर्भाने निवेदन देत ही मागणी केली आहे. त्यानुसार, दारव्हा तालुक्यात भुईमूग शेंगाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. तेलबिया हे वाण महागडे असल्याने काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना जागेवरून खरेदी आणि अधिक भावाचे आमिष दाखविले. त्यांच्या या आमिषाला बळी पडत शेतकऱ्यांनी त्यांना आपला शेतमाल दिला. परंतु नंतर याचे चुकारे न करता व्यापाऱ्यांनी पळ काढला.
अशा प्रकरणात शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक झाली. त्यांनी न्यायासाठी पोलिस तक्रारही केली. आंदोलन, उपोषणाचा मार्गही पत्करला. परंतु त्यांना न्याय देण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. फसवणूक झालेल्यांना न्यायासाठी भटकावे लागत आहे. राज्यात देखील असे प्रकार नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. त्या सर्वांची दखल घेत अडत्यांना थेट खरेदी संदर्भात देण्यात येणारे अधिकार गोठविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.