
Parbhani News : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तेलंगणा मॉडेलच्या धर्तीवर माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनास सादर केलेला अहवाल तत्काळ लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी भारत राष्ट्र समितीतर्फे (बीआरएस) मंगळवारी (ता. २२) परभणी येथील शनिवार बाजार मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला.
तेलंगणा मॉडलच्या धरतीवर शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी १० हजार रुपये शेतीसाठी २४ तास योग्य दाबाची मोफत वीज द्यावी. शेतीसाठी बारमाही पाण्याची सोय करावी. शेतकऱ्यांना ५ लाख रुपये विमा संरक्षण द्यावे. कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी मूळ मालकांना परत द्याव्यात. परभणी जिल्ह्यात पावसाचा २१ दिवसांचा खंड पडल्यामुळे अग्रिम पीकविमा परतावा द्यावा. तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी.
तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधा द्याव्यात आदी मागण्यांसाठी प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.