
Buldana News : सध्या पावसाने खंड दिल्याने शेतकरी पीक वाचवण्यासाठी सिंचनाची धडपड करीत आहेत. पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्याने लावलेला सौरपंप चालत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत शेतकऱ्याने मेडाकडे तक्रार दिली असून संबंधित कंपनीकडून दुरुस्तीबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हटले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी येथील पंढरीनाथ उगले, राधाकिसन उगले या शेतकऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी सौरऊर्जा कृषिपंप घेतला आहे. टाटा कंपनी व ओसवाल कंपनीकडून हे पंप बसवून दिले आहेत. सध्या सौरऊर्जा पंप सुरू होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हेल्पलाइनवर अनेक वेळा संपर्क करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. या दोन्ही शेतकऱ्यांनी जानेवारी २०२२ मध्ये टाटा ऊर्जा कंपनीचे सौरपॅनेल व ओसवाल कंपनीचे मोटरपंप आणि स्टार्टर बसवलेले आहे. कंपनीच्या ५ कर्मचाऱ्यांनी जोडणी केल्यानंतर हे सौरपॅनेल व पंप १ महिनाभर सुरळीत चालले. मात्र ते चालेनासे झाले.
याबाबत कंपनीने बुलडाणा येथील टेक्निशियनकडे तक्रार केल्यानंतर त्याने २५ जुलै २०२३ ला पाहणी केली. त्यांच्याकडून दुरुस्ती झाली नाही. दुसरी तक्रार कंपनीने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर अनेक वेळा केली.
परंतु कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा गेल्या महिन्यात दोन वेळा हेल्पलाइनवर तक्रार केली. कंपनीकडून अद्यापही प्रतिसाद मिळत नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. ५) अकोला येथील महाऊर्जा जिल्हा व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.