
Parbhani News : परभणी जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या ४ पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा सरंक्षित केलेले क्षेत्र हे या पिकांच्या पेरणी क्षेत्राच्या तुलनेत अधिक आहे. पाथरी, सोनपेठ, पूर्णा तालक्यांतील पेरणीपेक्षा विमा संरक्षित क्षेत्र अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी, या पिकांसाठी क्षेत्र सुधार गुणांक लागू झाल्यास पीकविमा परतावा कमी दराने मिळू शकतो.
कृषी विभागाकडील माहितीनुसार, पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७ लाख ६१ हजार ८२३ पीकविमा अर्ज दाखल केले आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी ही ७ पिके मिळून एकूण ५ लाख १ हजार ६८ हेक्टरवरील पिके
विमा संरक्षित केली आहेत. त्यासाठी २ हजार ६१६ कोटी ४८ लाख ६४ हजार ६७ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. जिल्ह्यात शुक्रवार (ता. १८) पर्यंत ५ लाख ६ हजार १७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदाच्या एकूण पेरणीक्षेत्राच्या तुलनेत विमा संरक्षित क्षेत्र ५ हजार १०९ हेक्टरने कमी आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक पीकविमा अर्ज जिंतूर तालुक्यातून दाखल झाले आहेत. त्यानंतर परभणी, गंगाखेड तालुक्यांचा क्रमांक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.