
Pune News : गेल्या अनेक महिन्यानंतर टोमॅटोला चांगले दर मिळू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागले आहेत. आता टोमॅटोचे बाजारभाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने हस्तक्षेप केल्यास रयत क्रांती पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी दिला आहे.
शिंदे यांनी केंद्र व राज्य सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे. शेतीमालाचे बाजारभाव वाढले, की केंद्र व राज्य सरकार ते बाजारभाव नियंत्रित करते व शेतीमालाचे बाजारभाव पाडले जातात. एकंदरीत शेतीमालाची आधारभूत किंमत ठरवण्याची व्यवस्थाच प्रचंड चुकीची आहे. प्रत्येक शेतीमालाच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत शेतकऱ्यांना मिळते.
कधीतरी मागणी आणि पुरवठा किंवा तेजी-मंदीच्या कालावधीमध्ये एखाद्या शेतीमालाचे बाजारभाव वाढले की, लगेच आरडाओरड होते. सरकारकडून शेतीमालाचे बाजारभाव पाडले जातात. याच धरतीवरती अनेकवेळा बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून शेतीमाल रस्त्यावर फेकून दिला जातो किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमाल नष्ट झाल्यास सरकार नुकसान भरपाई देत नाही.
त्यामुळे शासनाला वाढलेल्या शेतीमालाचे बाजारभाव नियंत्रित करण्याचे नैतिक अधिकार नाहीत. याबाबत सरकारने योग्य तो निर्णय लवकर न घेतल्यास रयत क्रांतीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.