
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात भातपीक (Paddy Crop) कापणीचे काम गतीने सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७० टक्के भातपिकांची कापणी पूर्ण झाली आहे. अद्याप ३० टक्के कापणी शिल्लक असून दहा ते बारा दिवस कापणीला लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच भातपीक परिपक्व व्हायला सुरुवात झाली. अखेरीपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या पिके कापणी योग्य झाली होती. परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. २० ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू होता.
त्यामुळे शेतकऱ्यांना भातकापणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी पावसाची उघडीप मिळताच भातकापणी केली परंतु कापणीला गती मिळत नाही. पावसाने काही भागात भातपिकाचे नुकसानदेखील झाले.
गेले दहा-बारा दिवस पावसाने पूर्णतः उघडीप दिली. त्यामुळे भातपीक कापणीला वेग आला. शेतकरी रात्रंदिवस कापणी करीत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. देवगड तालुक्यातील भातपीक कापणी किरकोळ स्वरूपात शिल्लक आहे.
तर वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांत २० टक्केच भात कापणी शिल्लक आहे; मात्र कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांत अद्याप ४० टक्के भातपीक कापणी शिल्लक आहे. या भागातील कापणी पूर्ण व्हायला दहा ते पंधरा दिवस लागतील, असा अंदाज आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.