
कोल्हापूर : जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी (ता. १५) दुपारपर्यंत ६४ बंधारे पाण्याखाली गेले. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असला, तरी त्याचे प्रमाण कमी जास्त असल्याने नद्यांचे पाणी फार गतीने वाढत नसल्याची स्थिती आहे. अद्याप धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत नसल्याने महापुराचा (Flood) धोका सध्या तरी नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने (Heavy Rain) शुक्रवारी सकाळपासून उघडीप घेतली आहे; मात्र ढग दाटून येताच अधून-मधून मोठ्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारी दुपारी १२ वाजता ‘पंचगंगे’ची पाणीपातळी ३७ फूट ९ इंचांवर पोहोचली होती. इशारा पातळीवर जाण्यासाठी केवळ दीड फूट शिल्लक असल्याने प्रशासन दक्ष राहून बाधित ठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना देत आहे.
बंधारे, पूल पाण्याखाली गेलेल्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी इंचाइंचाने वाढत असल्याने काठावरील गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास मध्यरात्री पाणीपातळी इशारा पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १५) सकाळी आठच्या सुमारास संपलेल्या २४ तासांत गगनबावडा (Gaganbavada) तालुक्यात सर्वाधिक ७७.१ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात २४ तासांत पडलेला एकूण पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे ः हातकणंगले ९.६, शिरोळ ६.२, पन्हाळा ४०.२, शाहूवाडी २६.५, राधानगरी ४४.४, गगनबावडा ७७.१, करवीर २९.४, कागल २३, गडहिंग्लज २२.५, भुदरगड ४४.५, आजरा ५४.१, चंदगड ६१.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.