Marathwada Rain : मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पात उरला १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Water Crisis : मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांपैकी जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : लांबलेला व जोरदार पडणारा पाऊस मराठवाड्यातील पाणीसाठांची तहान कायम ठेवत असल्याचे दिसते आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील ७५ प्रकल्पांत १८ टक्के, तर ७४९ केवळ १० टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. त्यामुळे अपवाद वगळता सर्वदूर तुरळक, हलकी, मध्यम हजेरी लावणारा पाऊस सर्वदूर जोरदार पडत नाही तोपर्यंत पाणी साठ्याची स्थिती सुधारणार नसल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांपैकी जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. या जिल्ह्यातील लघू प्रकल्पांमध्ये आज घडीला केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. बीड जिल्ह्यातील १२६ व धाराशिव जिल्ह्यातील २०६ लघू प्रकल्पातही प्रत्येकी सात टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक असून, हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पात पाच टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

Water Storage
Water Shortage : पेण तालुक्यातील खारेपाट पावसाळ्यातही तहानलेलाच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९७ लघू प्रकल्पात आठ टक्के, लातूर जिल्ह्यातील १३४ लघू प्रकल्पात ११ टक्के, परभणीतील २२ लघू प्रकल्पात दहा टक्के, तर नांदेडमधील ८० लघू प्रकल्पात २७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गत तीन वर्षांतील आजच्या घडीला शिल्लक राहिलेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत हा पाणीसाठा सर्वांत कमी आहे.

मध्यम ७५ प्रकल्पांपैकी धाराशिवमधील १७ प्रकल्पांत सर्वांत कमी दहा टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील १६ प्रकल्पांत १८ टक्के, जालनामधील सात प्रकल्पांत २४ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत १९ टक्के, लातूरमधील आठ प्रकल्पांत १५ टक्के, नांदेडमधील नऊ प्रकल्पांत २९ टक्के, तर परभणीतील दोन प्रकल्पांत १८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Storage
Water Shortage : जळगावमध्ये भर पावसाळ्यात पाणीटंचाई

३५८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली

मराठवाड्यातील २० मध्यम व ३३८ लघू मिळून ३५८ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. लघू प्रकल्पांपैकी लातूर व छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी ४७, जालन्यातील ४४, बीडमधील ५७, धाराशिवमधील ९३, नांदेडमधील १८, परभणीमधील १२ व हिंगोलीतील २० प्रकल्पांचा समावेश आहे.

मध्यम प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगरमधील ४, धाराशिव व बीडमधील प्रत्येकी ६, लातूरमधील २ व जालना तसेच नांदेडमधील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

सीनाकोळगाव प्रकल्प तळाकडे

११ मोठ्या प्रकल्पांत ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पांपैकी सीनाकोळेगाव प्रकल्प तळगाठत असून, या प्रकल्पात उणे पंधरा टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वांत मोठा जायकवाडी प्रकल्पात २८ टक्के, माजलगावमध्ये १६ टक्के, मांजरामध्ये २३ टक्के, ऊर्ध्व पेनगंगामध्ये ४८ टक्के, निम्न तेरणामध्ये २८ टक्के, निम्न मनारमध्ये ३४ टक्के, निम्न दुधनांमध्ये २७ टक्के, विष्णुपुरीत ६३ टक्के, येलदरीत ५८ टक्के, तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात केवळ सात टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com