Buldana News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने (Hailstorm) थैमान घातले आहे. यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान (Crop Damage) झाले असून घरांची, गोठ्यांची पडझड झाली.
शासनाने तातडीने नुकसानीचे सरसकट पंचनामे करून १०० टक्के भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मका, कांदा, भाजीपाला, संत्रा, केळी यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये घरांवरील टिनपत्रे उडाले. घरांची पडझड झाली तर अनेकांच्या शेतातील गोठ्यांचीही पडझड झाली आहे.
या नैसर्गिक संकटाने शेतकरी कोलमडून पडला आहे. याआधी खरीप हंगामात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले होते. तर रब्बी हंगामातही अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून मोठी अपेक्षा होती.
परंतु खरीप आणि रब्बीतही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. खरीप हंगामातील मंजूर असलेली नुकसान भरपाई अजूनही हजारो शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यातच सातत्याने होत असलेल्या निसर्गाच्या कहरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
ही सर्व बिकट परिस्थिती पाहता सरकारने शेतकऱ्यांप्रति संवेदनशील होऊन झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करीत शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.