Farm Business: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळीस्ते (ता. कणकवली) येथील अब्दुल मेहबूब बागेवाडी या शेतकऱ्याने करारावर जमीन घेत नियोजनबद्ध भाजीपाला उत्पादनातून यश मिळवले आहे. जत्रा, उत्सवानुसार सातत्यपूर्ण उत्पादन, विक्री यातून उत्पन्नाची शाश्वती मिळवली आहे. बचत साधणाऱ्या उत्तम आर्थिक नियोजनातून या भूमिहीन शेतकऱ्याने १ हेक्टर शेतजमीन खरेदी केली आहे. .मुंबई-गोवा महामार्गावरील साळीस्ते हे गाव आहे. या परिसरातील अधिकतर शेतकरी खरीप हंगामात भातपिकांचे उत्पादन घेतात. याशिवाय या भागात आंबा, काजूची देखील मोठ्या प्रमाणात लागवड आहे. महामार्गावरच गाव असल्याने इतर बाबतीत गाव विकसित झाले आहे. याच गावातील साळीस्ते रामेश्वरवाडी येथे अब्दुल यांचे घर आहे. अब्दुल यांचे मुळ गाव कर्नाटक असून त्यांचे वडील मेहबूब हे ४० वर्षांपूर्वी जगण्यासाठी म्हणून कोकणात आले. साळीस्ते, तळेरे, खारेपाटण परिसरात ते मोलमजुरी करू लागले. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. कालांतराने ते साळीस्ते येथे स्थायिक झाले. त्यामुळे मेहबूब यांचे बालपण, प्राथमिक शिक्षण साळीस्ते येथेच झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण तळेरेमध्ये तर बारावी इलेक्ट्रॉनिकपर्यंतचे शिक्षण खारेपाटण येथे झाले..Jamun Farming Success Story: एका तपानंतर रंगले स्वामींचे ‘जांभूळ आख्यान’ .शेतीचा संकल्पइलेक्ट्रॉनिकचा अभ्यासक्रम शिकल्यानंतर अब्दुल याच्या मनात नोकरीचा विचार अजिबात आला नाही. त्यांना काही ठिकाणी संधी देखील होती. परंतु स्वतःचा व्यवसाय करावा असे त्यांनी ठरविले होते. त्यामुळे त्यांनी टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. गावासह आजूबाजूच्या गावांमध्ये टिव्ही दुरुस्तीचे काम सुरू केले. तीन, चार वर्षे हे काम त्यानी प्रामाणिकपणे केले. या कामाच्या निमित्ताने आजूबाजूच्या गावात जात असताना इतरांची शेती पाहण्यात यायची. वडिलांना मोलमजुरी करून त्यांचे शिक्षण करताना घरापुरती जागा विकत घेतली होती. .पण आपलीही शेती असली पाहिजे, या विचाराने उचल खाल्ली. जमीन खरेदी करण्याइतकी उत्तम आर्थिक स्थिती अद्याप झालेली नव्हती. मग त्यांनी भाडेकरारावर जमीन मिळविण्यासाठी चाचपणी सुरू केली. त्यांना मुंबई-गोवा महामार्गालगतच जमीन उपलब्ध झाली. जमीनमालक मुंबईतले असले तरी मुळचे हाडाचे शेतकरी. त्यामुळे भाडेकराराने दिल्यावर आपल्या शेतीची जमिनीची सुपीकता कमी झाली नाही पाहिजे, हाच एकमेव मुद्दा होता. अब्दुल यांनीही ‘सुपीकता कमी होणार तर नाहीच, पण वाढवतो’ असे आत्मविश्वासाने सांगितले. एवढ्या त्यांच्या शब्दावर जमीनमालकांनी दोन एकर जमीन कसलाही मोबदला न घेता कसण्याकरिता अब्दूल यांच्या स्वाधीन केली. अब्दुल यांचे कुटुंबीय हरखूनच गेले. ही घटना २०१० मधली..भाजीपाला शेती करण्याचा निर्णयजमीन उपलब्ध तर झाली, पण त्यात कोणते पीक घ्यायचे? असा प्रश्न पडला. कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात भाजीपाला उत्पादन तुलनेने कमी होते. त्यामुळे जिल्ह्यात कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे अब्दुल यांना माहीत होते. भाजीपाला उत्पादन घेतल्यास कुठे विकायचे, हा प्रश्न निर्माण होणार नाही. आजूबाजूला कणकवली, तळेरे, वैभववाडी, खारेपाटण, राजापूर अशा बाजारपेठा असल्याने भाजीपाला सहज विकला जाईल. यामुळे भाजीपाला लागवडीचा निर्णय पक्का केला. .शेतीचा फारसा अनुभव नसल्याने यू-ट्यूबसारख्या सामाजिक माध्यमावरील भाजीपाला उत्पादकांचे अनुभव ऐकले. परिसरातील भाजीपाला शेतकरी विशेषतः नापणे येथील उत्कृष्ट भाजीपाला उत्पादक रवींद्र गावडे यांच्याकडून आवश्यक तिथे मार्गदर्शन घेत भाजीपाला लागवड सुरू केली. प्रथम दोडका आणि भेंडी अशा पिकांची २० गुंठ्यांत लागवड केली. त्या पाठोपाठ २० गुंठ्यांत काकडी, कारली पिकांची लागवड केली. पहिल्या चार पिकांमध्येच त्यांना पिकाचा व बाजारपेठेचा बऱ्यापैकी अंदाज आला. मग त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने लागवडीमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली. पहिला हंगाम संपण्यापूर्वीच त्यांनी उर्वरित एक एकर जमिनीमध्ये पुन्हा भाजीपाला लागवड केली. त्यामध्ये त्यांनी पडवळ, वाल अशा पिकांची वाढ केली..हंगामनिहाय लागवडीचा फायदाकोकणात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, पितृपक्ष, जत्रोत्सव, मे महिन्यात चाकरमान्याची गर्दी होते. या कालावधीत प्रत्येक घरातून भाजीपाल्याला मोठी मागणी असते. परिणामी, चांगला दरदेखील मिळतो. त्यामुळे अब्दुल याने हंगामनिहाय लागवड करण्यास सुरुवात केली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सण सलग उत्सव येत असतात. त्यामुळे जूनमध्ये दोडका, पडवळ, काकडी, भेंडी, गवार, भोपळा अशा पिकांची ते लागवड करतात. त्याच प्रमाणे पितृपक्षामध्येही काही भाज्यांना विशेष मागणी असते. याशिवाय फुलपिकामध्ये झेंडूची लागवड करतात. नोव्हेंबरमध्ये मुळा, कलिंगड लागवड करतात. याशिवाय भाजीपाल्याची पुन्हा लागवड करतात. शेतीमध्ये अब्दुल यांनी सुरुवातीपासूनच तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला आहे. मल्चिंग, ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर त्यांनी केला आहे..Vegetable Farming: काशीफळ, दुधी भोपळ्याचा पावसाळी हंगामात आधार.भाजीपाला पिकांचा १५ वर्षांचा अनुभव*१ हेक्टर जमीन मालकीची तर अद्यापही दीड एकर जमीन कराराने घेतात. अशा प्रकारे एकूण चार एकर क्षेत्रामध्ये भाजीपाला लागवड करतात.वर्षभरात दोनदा पिके घेतात.मल्चिंग, ठिबक सिंचन आणि जिवामृताचा वापर करतातहंगामानुसार आणि श्रावण, गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्रौत्सव, जिल्ह्यातील जत्रा अशा बाबींचा मेळ घालत पिकांची निवड केली जाते.पावसाळ्यात दोडका, काकडी, पडवळ, कारले, भेंडी, गवार, भोपळा, झेंडू अशी पिके असतात. रब्बीमध्ये वाल, कलिंगड, मिरची, मुळा, वांगी ही पिके असतात. याशिवाय मुळा लागवडही ते मोठ्या प्रमाणात करतात. कोबी, फ्लॉवर, स्वीटकॉर्न, पपई, अननस इ. पिकांचेही प्रयोगही केले आहेत..पिकाचा ताळेबंदमुळ्याचे सुमारे १६ हजार पेंड्या उत्पादन मिळाले. प्रति पेंड सरासरी सहा रुपये असा दर मिळाला. या पिकातून १ लाख रुपये उत्पन्न मिळाले.कलिंगडाला प्रति किलो १२ ते १५ सरासरी दर मिळतो. या वर्षी २० रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यामुळे कलिंगड पिकांतून २ लाख ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले.भेंडी, दोडका, कारले, काकडी, भोपळा, पडवळ या भाज्यांना प्रति किलो सरासरी २० रुपये दर मिळतो. त्यातील दोडका पिकातून १ लाख रुपये, पडवळ पिकातून १ लाख रुपये, काकडी २० हजार रुपये, कारले पिकातून ३० हजार रुपये आणि वाल, भेंडी, गवार आणि झेंडू पिकांमधून खर्च वजा जाता ८० हजार रुपये उत्पन्न मिळाले.एकूण उत्पन्न - ६ लाख ९० हजार रुपये.उत्पादन खर्चमल्चिंग पेपर सात बंडल खर्च - १२ हजार ६०० रुपयेचार एकराचा नांगरणी खर्च- २७ हजार रुपयेशेणखत खर्च- २७ हजार रुपयेरासायनिक खत खर्च- २० हजार रुपयेविद्राव्य खते, सेंद्रिय खते आणि जैविक खते- ३५ हजार रुपये.जिवामृत तयार करणे- ५ हजार रुपयेकीटकनाशक- ५ हजार रुपयेमजुर खर्च- १ लाख ८० हजार रुपयेबांबू, टोमॅटो रोप, आणि जाळी- २० हजार रुपयेचार एकरांमधील एकूण खर्च- ३ लाख ३१ हजार ६००निव्वळ नफा- ३ लाख ५८ हजार ४०० रुपये.घरगुती खर्चाचे नियोजनबागेवाडी यांच्या कुटुंबामध्ये आई बेगम, पत्नी सलिमा यांच्यासह चार मुले असे सात सदस्य आहेत. कौटुंबिक खर्चासाठी साधारण वर्षभरात १ लाख २० हजार रुपये खर्च येतो.मोठा मुलगा अरमान सातवीत, मुलगी आयेशा पाचवीत, मुलगा अरबाज तिसरीत, तर मुलगी अदा ही पहिलीत शिकत आहे. त्यांच्या शिक्षणांवर १० हजार रुपये खर्च होतो.कुटुंबाच्या विमा काढला असून, त्याचा हप्ता दरवर्षी १५ हजार रुपये आहे.कुटुंबाच्या आजारपणे व किरकोळ खर्चासाठी २० हजार रुपये लागतात..विक्रीची पद्धतसुरुवातीला काही व्यापाऱ्यांना माल पोहोच केला जायचा. मात्र आता व्यापारी शेतात येऊन माल खरेदी करतात. सध्या राजापुर, खारेपाटण, पाचल, वैभववाडी, तळेरे, चिंचवली या भागातील १५ हून अधिक व्यापारी भाजीपाला खरेदी करतात.कलिंगडाला गोव्यामध्ये मोठी मागणी असते. या शिवाय स्थानिक व्यापारी देखील खरेदी करतात.जिल्ह्यातील मोठ्या जत्रोत्सवाचा तारखांचा अंदाज घेऊन कलिंगड लागवड करतात.अब्दुल मजुरांवर खूप कमी खर्च करतात. ते स्वतः जास्तीत जास्त वेळ शेतीमध्ये काम करतात..भूमिहीन ते जमीनमालककौटुंबिक खर्च व पुढील हंगामाचा खर्च बाजूला काढल्यानंतर शेतीतून आलेला नफा बचतीकडे वळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशाच प्रकारे साठविलेल्या १५ वर्षांच्या बचतीतूनच २०२४ या वर्षी १७ लाख रुपये किमतीची १०० गुंठे शेतजमीन खरेदी केली आहे. आता ते खरेखुरे जमीनमालक बनले असून, हक्काच्या जमिनीत ते भाजीपाला उत्पादन घेत आहेत.- अब्दुल मेहबूब बागेवाडी९००४२४२९४०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.