Revansiddha Farmer Group Success Story: सांगली जिल्ह्यातील कुर्ली (ता. खानापूर) परिसरातील युवा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन श्री रेवणसिद्ध शेतकरी गटाची स्थापना केली आहे. सुमारे ८० ते ९० शेतकरी गटाशी जोडले आहेत. भाजीपाला उत्पादन ते वाहतूक, बाजारपेठ यंत्रणा, विक्री अशा प्रत्येक टप्प्प्यावर परस्पर सहकार्याची मजबूत साखळी त्यांनी उभी केली आहे. गटाने आज ५० लाखांच्या उलाढालीपर्यंत मजल गाठली आहे. गट असावा तर रेवणसिद्धसारखा असेच म्हणावे लागेल..सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुका हा अवर्षणग्रस्त पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत द्राक्ष उत्पादन आणि निर्यातीच्या बाबतीत येथील शेतकऱ्यांनी राज्याच्या नकाशावर वेगळी छाप उमटवली आहे. खानापूर तालुक्यातील विटा शहर हे पोल्ट्री व्यवसाय आणि वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. या शहरापासून पाच किलोमीटरवर कुर्ली गाव वसले आहे. दुष्काळाच्या झळा इथल्या शेतकऱ्यांनीही सोसल्या आहेत..पाण्याअभावी मर्यादित शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांनी प्रयोगशील वृत्तीच्या जोरावर परिस्थिती बदलण्याचा ध्यास घेतला. त्यात यशही मिळवले. टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी गावापर्यंत पोहोचल्याने शाश्वत पाणी मिळाले. बागायती शेतीचे प्रमाण वाढले आहे. द्राक्ष आणि ऊस ही गावातील प्रमुख पिके असली तरी पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी आता भाजीपाला उत्पादनाकडेही मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. आधुनिक शेतीपद्धती, पीक वैविध्य आणि बाजारपेठांचा अभ्यास यातून इथला शेतकरी प्रगतिशील झाला आहे..Agriculture Success Story: नगदी पिकांना दिली आर्थिक शिस्तीची जोड .सामूहिकतेतून यशाची वाटकुर्ली गावातील ईश्वर घाडगे, संजय काटकर, विठ्ठल पिसाळ, सुरेश जाधव, किशोर चव्हाण, प्रतीक चव्हाम आणि सुभाष चव्हाण (तांदळगाव) या प्रयोगशील युवा शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या सावटातून बाहेर येत भाजीपाला शेतीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी पीक उत्पादनात चांगला जम बसवला. मात्र स्थानिक बाजारपेठेवरच अवलंबून राहावे लागे. मागणी मर्यादित होती. अपेक्षित दर मिळत नव्हते. मेहनत, खर्चाच्या तुलनेत कमाई थोडीच व्हायची. समस्यांवर उपाय शोधताना या युवा शेतकऱ्यांच्या लक्षात महत्त्वाची बाब आली. .एकट्याने संघर्ष करण्यापेक्षा एकत्र आलो तर अनेक अडथळे सहज दूर होऊ शकतात. याच विचारांतून वीस वर्षांपूर्वी श्री रेवणसिद्ध शेतकरी गटाचा जन्म झाला. मोजक्या शेतकऱ्यांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात हळूहळू खानापूर तालुक्यातील तांदळगाव, खंबाळे, आळसंद, विटा, कुर्ली आणि सातारा जिल्ह्यातील वडूज, कुकुडवाड (ता. माण) आदी गावांतील शेतकरी सहभागी होऊ लागले. विश्वास, पारदर्शकता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर गट विस्तारत गेला. आज गटाशी ८० ते ९० शेतकरी जोडले आहेत. गटातील प्रत्येक शेतकरी दहा गुंठ्यांपासून ते दहा एकरांपर्यंत भाजीपाला लागवड करतो..गटाचीच वाहतूक व्यवस्थाभाजीपाला हा नाशिवंत माल असल्याने वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व गटातील शेतकऱ्यांनी ओळखले. वाहतुकीची जबाबदारी गटातील एखाद्या सदस्याकडे दिल्यास खर्च कमी होईल, नियोजन सुलभ होईल आणि सर्वांना त्याचा फायदा मिळेल असा विचार पुढे आला. तांदळगाव (ता. खानापूर) येथील सुभाष चव्हाण यांच्याकडे वाहतूक व्यवस्थेची धुरा सोपविण्यात आली. गटाच्या विश्वासाला सार्थ ठरवत त्यांनीही वाहतूक सुसूत्र आणि वेळेवर करण्याची जबाबदारी सांभाळली..गटातील शेतकरी सांगतातआमच्या मालाचा दर आम्ही ठरवतो. तो गटातील अन्य शेतकऱ्यांना शेअर केला जातो. तेही विविध बाजारपेठांमधील दरांचा अंदाज घेतात. त्यातून कोणत्या बाजारात विक्री करायची हे ठरवले जाते. परिसरातील काही व्यापारी देखील खरेदीला बांधावर येतात. त्यामुळे वाहतूक खर्चही कमी होतो.पीकनिहाय निविष्ठांची मागणी, नोंदणी एकत्र होते. साहजिकच रोपे, पॉली मल्चिंग पेपर, खते आदींची एकाचवेळी खरेदी होते. त्यातून आर्थिक बचत होते..Sericulture Success Story: पाणलोटामुळे रेशीम शेतीला चालना.भविष्यात भाजीपाला निर्यातीच्या दिशेने वाटचाल करण्याचा गटाचा मानस आहे. त्यासाठी आवश्यक पॅक हाउस, साठवणूक व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करण्याचे नियोजन आहे. या संपूर्ण प्रक्रियेत गटातील प्रत्येक सदस्याचा सहभाग आणि विचार महत्त्वाचा मानला जाणार आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच निर्यातीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलली जातील.गटातील शुभम घाडगे सांगतात, की माझे शिक्षण बी.एस्सी. ॲग्रीपर्यंत झाल्याने शेतीकडे पाहण्याचा तांत्रिक दृष्टिकोन तयार झाला आहे. शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गटातील अन्य शेतकऱ्यांसाठीही करतो. नवे तंत्रज्ञान अवगत करून त्याचाही फायदा मिळवून देतो..श्री रेवणसिद्ध गटाची वैशिष्ट्ये दृष्टिक्षेपातपीक किमान क्षेत्र (एकर)टोमॅटो १५०ढोबळी मिरची ५०काकडी १५झेंडू २०कारले २०कांदा ३०.वर्षातील विविध हंगामांचा अभ्यास करून मागणी व दर लक्षात घेऊन उन्हाळी व पावसाळी हंगामांची निवड.प्रतवारी केल्याने अपेक्षित दर मिळण्यास मदत.कारले, काकडी, दोडका, ढोबळी मिरची, टोमॅटो, झेंडू, कलिंगड, टरबूज आदी पिके.माहितीची देवाणघेवाण ही सर्वांत मोठी ताकद.लागवड ते काढणीपर्यंत व्यवस्थापन एकत्र करण्याचा प्रयत्न. एकमेकांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी. त्यातून व्यवस्थापनातील त्रुटी लक्षात येऊन सुधारण्यास मदत होते. जे प्लॉट चांगले आहेत त्यात कोणते तंत्रज्ञान वापरले हे समजून एकमेकांत उत्पादनाबाबत चढाओढ निर्माण होते..बाजारपेठेच्या अनुषंगानेएकाचवेळी शेतकऱ्यांचा विविध माल मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना उपलब्ध होऊ लागला. त्यातून अपेक्षित दर हक्काने मिळवणे गटाला शक्य झाले.एकाच व्यापाऱ्याला माल न देता त्यांचे पर्याय निर्माण केल्याने दरांची स्पर्धा तयार झाली. आज सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई यासह दिल्ली, अहमदाबादपर्यंत गटाचा भाजीपाला निर्यात होत आहे. श्री रेवणसिद्ध गट म्हटले की दर्जेदार, खात्रीशीर माल अशी प्रतिमा व्यापाऱ्यांत तयार झाली आहे. साहजिकच तेजी- मंदीत इतरांपेक्षा दोन रुपये अधिक दर त्यांना मिळतो..विविध बाजारपेठांतील विविध मालाची आवक, ग्राहकांचा कल या माहितीचे दररोज संकलन. त्यामुळे एकाच बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागत नाही.वर्षाला ५० ते ६० लाखांपर्यंत गटाची उलाढाल.संजय काटकर ७०३०३०४०७०सर्वजित पिसाळ ७९७७२६९३२६दीपक जाधव ९८६०३५४८२४शुभम घाडगे ९३५६९५८०९२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.