Indian Agriculture: सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूरपासून अवघ्या २०-२५ किलोमीटरवर पाकणी हे गाव आहे. येथील पाकणी ते शिवणी या मार्गावर दत्तात्रय साठे यांची सीना नदीच्या काठावर १० एकर शेती असून, त्यात सध्या ३ एकर पेरू, २ एकर उडीद, ३ एकर ऊस अशी पिके आहेत. २ एकर क्षेत्र पुढे रब्बी ज्वारीसाठी ठेवले आहे. पाकणी हे गाव औद्योगिक क्षेत्रात मोडत असले, तरी सीना नदीमुळे पाणी उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे या गावात प्रामुख्याने ऊस, कांदा आणि भाजीपाला या पिकावर शेतकऱ्यांचा भर असतो..दत्तात्रय यांचे वडील उत्तम साठे रेल्वेमध्ये नोकरीस होते. त्यांनीही नोकरी सांभाळत प्रामुख्याने ऊस शेती करत. २०१७ मध्ये दत्तात्रय यांनी आयटीआय उत्तीर्ण केले. त्यानंतर पुणे येथील एका खासगी कंपनीत दोन वर्षे नोकरी केली. मात्र मिळणारा पगार आणि शहरातील खर्च याचा मेळ बसत नसल्याने गावी परतण्याचा निर्णय घेतला. शेती करण्याच्या त्यांच्या निश्चयाला कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला. आता वडील सेवानिवृत्त असून, त्यांच्यासह आई सौ. वनिता आणि पत्नी सौ. वैष्णवी यांची शेतीमध्ये मोलाची मदत होते..पेरूची लागवड२०१९ मध्ये प्रत्यक्ष शेती सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षी दत्तात्रय यांनी काकडी पीक केले. त्यातून चांगले उत्पन्न हाती आल्यामुळे त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. त्यांच्या ऐकण्यामध्ये पेरू पिकाची माहिती आली. मग त्यांनी इंदापूर (जि. पुणे) परिसरातील काही शेतकऱ्यांच्या पेरू बागा पाहिल्या. नजीकच्या कोंडी गावातील पेरू उत्पादक अमोल पाटील यांच्याकडून मार्गदर्शन घेत पेरू लागवडीचा निर्णय घेतला. २०२० मध्ये प्रथम तैवान पिंक या पेरू वाणाची लागवड केली..‘तैवान पिंक’ पेरूची वैशिष्ट्येगर्द गुलाबी रंगाच्या क्रिस्पी (कुरकुरीत) गरामध्ये बियांचे प्रमाणही कमी असते.फळांची रचना सुटसुटीत अन् एकसारखी असून, वजन सरासरी ३०० ते ५०० ग्रॅमपर्यंत भरते.फळ काढणीनंतर १० ते १५ दिवस टिकत असल्याने दूरवरच्या बाजारपेठांमध्ये पाठवणे शक्य होते.लागवडीनंतर अवघ्या दीड वर्षात झाडे उत्पादन सुरू होते. योग्य नियोजनाने वर्षभरात दोन बहर घेणे शक्य.आकर्षक, उत्तम गोडीमुळे या पेरूला वर्षभर चांगली मागणी व दर मिळतो..Guava Crop Pest: पेरूवरील नवी केसाळ शेपटाची मावा कीड.पेरू व्यवस्थापनातील ठळक बाबीखात्रीशीर व आलटून-पालटून उत्पादनासाठी दीड एकराचे प्रत्येकी दोन प्लॅाट तयार केले.लागवडीपूर्वी जमिनीची उभी-आडवी नांगरट, रोटरद्वारे चांगली मशागत करून बेड तयार केले. बेडमध्ये प्रति एकरी २ टन कोंबडीखत, ५ टन शेणखत भरून घेतला. त्यावर लागवडीवेळी ६ बाय १० फूट किंवा ८ बाय ६ फूट अंतरावर सघन लागवड करून कमी जागेत जास्त झाडांची संख्या साधली.बेसलडोस म्हणून १०ः२६ः२६- २०० किलो, १८ः४६ः० - १०० किलो, निंबोळीपेंड - १०० किलो, एसएसपी - २०० किलो टाकला.त्यानंतर झाडांची चांगली वाढ झाल्यानंतर बहराचे योग्य नियोजन केले.बहर धरताना जानेवारी ते मार्च आणि जून ते सप्टेंबर अशा दोन टप्प्यांत बहर धरला जातो. मुख्यतः बाजारातील पेरूची स्थिती पाहून घेतला जातो..खतांचे नियोजनवाफसा पाहूनच पाण्याचा नियमित आणि मोजकाच पुरवठा ठिबकद्वारे केला जातो.फळधारणेच्या काळात पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास फळांची गोडी आणि वजन वाढते.पहिल्या महिन्यात १२ः६१ः० एकरी ४ किलो ड्रीपद्वारे सोडले आणि ह्युमिक अॅसिड १ किलो सोडले..दुसऱ्या महिन्यात १३ः४०ः१३ आणि १२ः६१ः० एकरी प्रत्येकी ४ किलो सोडले.तिसऱ्या महिन्यात फळसेटिंग झाले, त्या वेळी पुन्हा १३ः४०ः१३ आणि १२ः६१ः० एकरी प्रत्येकी ४ किलो सोडले.चौथ्या महिन्यात फळे आणखी आकार घेतात, तेव्हा सूक्ष्म अन्नद्रव्ये ड्रीपद्वारे सोडली.पाचव्या महिन्यात ०ः४८ः४७ आणि ०ः४०ः३७ एकरी प्रत्येकी अडीच किलो प्रमाणात सोडले.त्यानंतर फळांना फोमचे बॅगिंग केले जाते. त्यावेळी केएसपी, पीएसबी सोडले जाते. एकरी पाच किलो ६ः६०ः२०, पाच किलो ०ः५२ः३४, अडीच किलो ०ः४७ः४८ आणि ०ः४०ः३७ सोडले..कीड-रोग नियंत्रणफळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत प्रति एकरी ४ ते ५ कामगंध सापळे लावले जातात.झाडाची उंची ६ ते ७ फुटांपर्यंत मर्यादित ठेवतात. त्यामुळे सूर्यप्रकाश शेवटच्या फांदीपर्यंत पोहोचतो. फळांची काढणी सोपी होते.फळ लिंबाच्या आकाराचे (साधारण २०-२५ ग्रॅम) झाल्यावर त्यावर फोम नेट आणि पॉलिथिन बॅग लावली जाते. त्यामुळे फळाचा रंग आकर्षक, तजेलदार गुलाबी राहतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे फळमाशीचा प्रादुर्भाव पूर्णपणे रोखला जातो. फळावर डाग किंवा चट्टे पडत नाहीत.साधारण सहाव्या महिन्यानंतर फळ काढणीला येते, त्यानंतर दीड महिन्यात काढणी पूर्ण होते.या बागेचा बहर संपतो, तोच पुन्हा दुसऱ्या बागेचा बहर धरलेला असतो. अशा पद्धतीने आलटून-पालटून वर्षभर उत्पादन आणि उत्पन्नाचे नियोजन केले जाते..Guava Farming: पेरूतून मिळविले आर्थिक स्थैर्य.बॅगिंगमुळे वाढते गुणवत्ता, दर्जाफळ लिंबाच्या किंवा गोटीच्या आकाराचे (साधारण १५ ते २५ ग्रॅम) झाल्यावर बॅगिंग सुरू केली जाते. एकाच देठावर २-३ फळे असल्यास फक्त एकच मजबूत फळ ठेवून बाकीची फळे काढून टाकली जातात. सर्वप्रथम फळावर पांढऱ्या रंगाची मऊ फोम नेट चढवली जाते. फोम नेटवर खाली बारीक छिद्र असलेली पारदर्शक बटर पेपर पिशवी चढवली जाते. तिचे तोंड फळाच्या देठाजवळ घट्ट बांधले जाते..त्यामुळे हवा खेळती राहत असली तरी कीटक किंवा पाणी आत जात नाही. फळमाशीला फळावर अंडी घालता येत नाहीत, त्यामुळे फळ किडण्याचा धोका राहत नाही. थेट कडक ऊन फळावर पडत नसल्यामुळे फळाची त्वचा करपत नाही. झाडाच्या पानांचे किंवा फांद्यांचे घर्षण होत नाही. फळाला आकर्षक, डागविरहित आणि तजेलदार रंग मिळतो. बॅगिंग केल्यानंतर फळावर थेट कीटकनाशकांची फवारणी होत नाही, ज्यामुळे ग्राहकांना विषमुक्त व सुरक्षित फळ मिळते. परिणामी, बॅगिंग केलेल्या फळांचा दर्जा-गुणवत्ता वाढतोच, पण दिसायलाही ते अतिशय उत्तम दिसते..दोन बहरांचे नियोजन ठरले फायदेशीरपेरूला साधारण जून ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च असे दोन बहर घेतले जातात. दत्तात्रय यांनी यामध्ये वेगळे नियोजन केले आहे. तीन एकर क्षेत्राचे दोन भाग करून प्रत्येकी दीड-दीड एकर क्षेत्रात आलटून-पालटून बहर घेण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण बाग उत्पादनात न ठेवता टप्प्याटप्प्याने उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे एखाद्या क्षेत्रातून कमी उत्पन्न मिळाले, तरी पुढच्या टप्प्यातील क्षेत्रातून हमखास मिळतेच. त्यांचे हे नियोजन त्यांना फायदेशीर ठरले आहे..व्यापारी थेट बांधावरगेल्या ५-६ वर्षापासून त्यांच्याकडे पेरू होतो. सुरुवातीला मार्केटिंगमध्ये अडचण आली, पण मागच्या दोन तीन वर्षापासून व्यापारी थेट त्यांच्या बांधापर्यंत येऊन खरेदी करू लागले आहेत. बाजारातील पेरूच्या दराचा अंदाज घेऊन व्यापाऱ्यांशी ते बोलणी करतात. या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून पुढे मुंबई, हैदराबाद, पुणे, नागपूर, बंगळूर, म्हैसूर इ. शहरात त्यांचा पेरू विक्रीसाठी जातो..पाच वर्षांत एकरी ४६ लाखांचे उत्पन्नपारंपरिक पिकांना फाटा देत दत्तात्रय यांनी पेरूच्या बागेतून योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अवघ्या पाच वर्षांत एकरी तब्बल ४६ लाख ४० हजार रुपयांचे ढोबळ उत्पन्न मिळविण्याची किमया साधली आहे. पेरू लागवडीनंतर सन २०२२ मध्ये पहिल्याच वर्षी त्यांना एका एकरातून २० टन उत्पादन मिळाले. त्या वेळी ३० रुपये प्रति किलोचा सरासरी दर मिळून ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यातून सुरुवातीचा साडेतीन लाखांचा खर्च पहिल्याच वर्षी निघून अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यानंतर २०२३ मध्ये बागेतून विक्रमी ४० टन उत्पादन मिळाले आणि सरासरी दरही ३२ रुपये मिळाला..त्यामुळे १२ लाख ८० हजार रुपयांचे एका वर्षातील सर्वाधिक उत्पन्न मिळाले. २०२४ मध्ये उत्पादन घटून २५ टनांवर आले, तरी बाजारपेठेत ५० रुपये उच्चांकी दर मिळाला. त्यामुळे १२ लाख ५० हजार रुपयांची कमाई झाली. २०२५ मध्ये २७ टन उत्पादनातून ३० रुपये दराने ८ लाख १० हजार रुपये, तर २०२६ मध्ये उत्पादन १४ टनांवर आले असले, तरी ५० रुपये असा चांगला दर मिळाला. त्यामुळे ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. दरवर्षी बागेच्या व्यवस्थापनावर एकरी साधारण अडीच ते ३ लाख रुपये खर्च होतो. हवामानाप्रमाणे उत्पादन आणि बाजारपेठेतील आवकेप्रमाणे होणारी दरतील चढ-उतार लक्षात घेतली तरी पेरूच्या उत्पन्नामुळे कुटुंब आर्थिक समृद्धीच्या दिशेने निघाले आहे. पूर्वी करत असलेल्या ऊसशेतीच्या तुलनेत तर पेरू शेतीने भरघोस यश पदरात घातले आहे.- दत्तात्रय साठे, ९१४५४८२४६७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.