Village Success Story: जागजी (ता. जि. धाराशिव) येथील अनिल सावंत या अभियंता युवकाने मोठ्या शहरांमधून मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. मात्र वेगळे काही करण्याच्या ध्येयातून नोकरी सोडून ते गावी परतले. दुग्ध प्रक्रिया उद्योगाची निवड केली. उत्तम गुणवत्ता, यांत्रिकीकरण, तंत्रज्ञान, शेतकरी नेटवर्क आणि मार्केटिंग कौशल्य यांची जोड देत आज नऊ उत्पादनांच्या निर्मितीचा उद्योग त्यांनी थाटला आहे. केसरी नंदन ब्रॅंड लोकप्रिय करीत महिन्याला २५- ३० लाखांच्या उलाढालीपर्यंत या युवकाने प्रेरणादायी भरारी घेतली आहे. .धाराशिव हा मराठवाड्यातील दुष्काळी जिल्हा समजला जातो. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही शेती क्षेत्रात विविध प्रयोगांची धडपड करणारे शेतकरी येथे दिसून येतात. याच तालुक्यात जागजी येथे अनिल अशोकराव सावंत यांच्या कुटुंबाची १६ एकर शेती आहे. अनिल शिक्षणात पहिल्यापासूनच हुशार होते. ऑटोमोबाइल्स शाखेत तंत्रनिकेतनची पदविका घेतल्यानंतर कराड ((चि. सातारा) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी २००८ मध्ये मेकॅनिकल शाखेतून अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली. त्यानंतर कँपसमधूनच मुंबई येथील कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर तेथे सात तर पुण्यात दोन वर्षे असा नऊ वर्षांचा नोकरीचा अनुभव घेतला..Dairy Farming Success Story: दुग्ध व्यवसाय हेच झाले माझे विश्व.वेगळे काही करण्याचे ध्येयअनिल नोकरीत स्थिर झाले होते. कंपनी मोठी होती. वार्षिक पॅकेज मनासारखे होते. जीवनाची घडी उत्तम बसली होती. तरीही केवळ नोकरी करीत राहण्यापेक्षा व आपल्या कुटुंबापुरते पाहण्यापेक्षा जीवनात अजून वेगळे काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागले होते. त्यातच कोरोनाचा संकटाचा माचा काळ आला होता. अशावेळी गावी जाऊन स्वतःचा उद्योग सुरू करावा असे त्यांनी ठरवले. .सर्व विचारांती त्यांनी नोकरी सोडण्याचे पाऊल उचलले आणि सव २०१९ मध्ये ते गावी परतले. येथे तीन उद्योगांची नावे त्यांच्यापुढे होती. बाजारपेठांचा एकूण अभ्यास व सर्वेक्षण यातून त्यातील दुग्धव्यवसायाची त्यांनी निवड केली. पायाभरणी करत असतानाचा कोरोनाच्या काळात वर्षभर तसे काहीच करता आले नाही. मात्र नैराश्य न घेता या काळात उद्योगाची पूर्वतयारी केली. एक लाखाच्या गुंतवणुकीतून मुरुड ते जागजी रस्त्यावर आपल्या शेतात शेड उभारून उद्योग सुरु केला..दुग्धजन्य पदार्थाची निर्मितीदुधापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करायचे हेच निश्चित केले होते. गायी, म्हशी मिळून घरचे सुमारे १५ पर्यंत पशुधन होते. मात्र मोठ्या प्रमाणात उद्योग करायचा व वेगवेगळे पदार्थ तयार करायचे त दुधाची मोठी गरज होती. दहावीपर्यंत शिकलेले थोरले बंधू अरविंद पूर्वीपासून शेती करतात. पहिल्या टप्प्यात त्यांनी गावातून दूधसंकलन सुरु केले. त्यामुळे प्रक्रियेसाठी मोठा वाव मिळाला. पहिली दोन वर्षे धडपड करण्यात व शिकण्यातच गेली. हळूहळू उत्पादन, बाजारपेठा, मागणी यांचा अंदाज येऊ लागला. पदार्थांची गुणवत्ता जपणे, उत्पादनांच्या निर्मितीत खंड न ठेवणे या गोष्टींवर भर दिला. पाहता पाहता आज सुमारे सहा ते सात वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. स्वतःकडील ५० लिटरपर्यंत तर उर्वरित बाहेरील असे मिळून प्रति दिन दीडहजार ते दोनहजार लिटर दूध संकलित होते. तूप, पनीर, दही, खवा, बासुंदी, श्रीखंड असे सुमारे नऊ पदार्थ आज तयार केले जातात. केसरी नंदन या ब्रँडनेमने विक्री होते..Dairy Business: दुग्ध व्यवसायातील अपयश पचवून प्रक्रिया उद्योगात खंबीर वाटचाल.उत्पन्नातूनच सुविधा आणि यंत्रसामग्रीसर्व उत्पादनांची निर्मिती यांत्रिक पद्धतीने होते. त्यासाठी दोन कोटींची गुंतवणूक करून सुमारे नऊ यंत्रे घेतली आहेत. सुरवातीला सर्व सुविधांसाठी एकदम खर्च केला नाही. जसजसा नफा मिळत जाईल त्यानुसार एकेक यंत्राची खरेदी केली. शीतगृह आहे. एकहजार लिटर क्षमतेचे बल्क कुलर असून येत्या काळात पाच हजार लिटरचे घेण्यासोबत साठवणुकीच्या सुविधा तयार केल्या आहेत. रोजच्या दूधसंकलनात वाढीचे नियोजन आहे. दुग्धजन्य पदार्थ जास्त काळ ठेवता येत नाहीत. त्यामुळे बाजारपेठेतील पदार्थांच्या मागणीवर लक्ष ठेऊन तारेवरची कसरत करावी लागते..बाजारपेठ तयार केलीदुग्धजन्य पदार्थामध्ये कोणतेही प्रिझर्व्हेंटीव्हजचा वापर केला जात नाही. केवळ आवश्यक फ्लेव्हर्स मात्र समाविष्ट केले जातात. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केलेले नाही. त्यामुळे आजमितीला लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यात आपल्या उत्पादनांना अनिल यांनी बाजारपेठ तयार केली आहे.ताही प्रमाणात पुणे, मुंबई येथेही मालाची विक्री होते. उद्योगाच्या सुरवातीच्या काळात असलेली एक लाखांची मासिक उलाढाल आता २५ ते ३० लाखांवर पोचली आहे. उद्योगात २० व्यक्तींना रोजगार दिला आहे. अनिल यांना वडील अशोकराव ,मोठे बंधू अरविंद यांची विविध कामांत साथ मिळते. कुटुंबातील जोत्स्ना (अनिल यांची पत्नी) व मीना (अरविंद यांची पत्नी) यांचाही मोठा आधार आहे. आजोबा रंगनाथ यांचे मोलाचे मार्गदर्शन अनिल यांना मिळाले आहे..मनुष्यबळ व्यवस्थापनसुरवातीला शीतगृह नव्हते. डीप फ्रिजरमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ ठेवले जायचे एकदा वीज पुरवठा थांबला. स्टॅबलाईझर जळून गेले. दुधाचे खूप मोठे नुकसान झाले. लागले. ग्रामीण भागात विजेची मोठी समस्या असते. मात्र गावठाण फीडरमधून समस्येवर उपाय शोधला. स्टॅबलाईझरचीही जोड आहे.पदार्थ विविध ठिकाणी पोहोच करण्यासाठी नोकरीच्या काळात घेतलेल्या कारचा वापर होतो. याशिवाय वाहतुकीचे साधनही घेतले आहे. युनिटमधील कामगारांचा आत्मसन्मान जोपासला जातो. .त्यांनी सुचविलेल्या गोष्टीची दखल घेऊन अंमलबजावणी होते. यामुळे मालक व कामगार असे अंतर ठेवलेले नाही. त्यामुळे मनुष्यबळाची समस्या कधीच जाणवली नाही. दुधाला चांगला दर व दर दहा दिवसांनी नियमित पैसे देण्यात सातत्य ठेवल्याने दुग्धोत्पादक शेतकरी विश्वासाने कायम जोडले आहेत. येत्या काळात दूध संकलन पाच हजार लिटरपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. कोणताही उद्योग सुरु करताना स्वतःकडे भांडवल असणे आवश्यक आहे. विस्तार होत जाईल तशी कर्जाची सुविधा वापरावी. कष्ट, जिद्द व चिकाटी यांना पर्याय नसलाच पाहिजे. स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आहे. त्यामुळेच तर तुमची प्रगती होत असते.अनिल सावंत ९७३०१७२१४१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.