Ajande Village Agricultural Transformation: सूर्यफूल हे अत्यंत महत्त्वाचे तेलवर्गीय पीक दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील अजंदे (ता. मालेगाव) हे छोटेसे गाव सूर्यफूल शेतीसाठी प्रसिद्धीस आले आहे. गिरणा धरणाच्या गाळपेऱ्यात बॅक वॉटर क्षेत्रात गावातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात सूर्यफुलाचा हुकमी पर्याय मिळाला आहे. अभ्यास व सुधारित तंत्रातून उत्पादन व गुणवत्ता उंचावून आपले अर्थकारणही या पिकातून उंचावण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत. .अलीकडील वर्षात सूर्यफुलासारख्या अत्यंत महत्त्वाच्या तेलवर्गीय पिकाखालील क्षेत्र कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यतील अजंदे गावात मात्र या पिकाबाबतचे सकारात्मक चित्र पाहण्यास मिळते आहे. मालेगाव तालुक्यात पूर्वेला हे गाव येते. गिरणा धरणाच्या बॅकवॉटरचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात होतो. धरणाच्या सुपीक गाळपेऱ्यात पूर्वी उन्हाळी बाजरी, मका, चारा आदी पिके घेतली जायची. मात्र वाढती मजुरी व उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे या पिकांमधून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळत नव्हते..अशावेळी येथील शेतकऱ्यांना गावातील चंद्रकांत शंकर ठाकरे, जयसिंग शंकर सोळंके आदी प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पुढाकारातून उन्हाळी सूर्यफुलाचा पर्याय मिळाला. सन २०२० मध्ये एरंडोल (जि. जळगाव) येथील नातेवाइकांकडून सोळंके यांनी सूर्यफुलाविषयी माहिती घेतली. धरणाच्या गाळपेर क्षेत्रात दोन एकरांत या पिकाचा प्रयोग केला. कमी अनुभवामुळे व्यवस्थापनात काही त्रुटी राहिल्याने अपेक्षित उत्पादन व नफा मिळाला नाही. परंतु गावातील शेतकऱ्यांचा त्या निमित्ताने या पिकाचा सखोल अभ्यास झाला..Dodka Production: दोडका उत्पादनात एकरी तीन ते सहा टन वाढ.सन २०२१ मधील कोरोनाच्या कठीण कालखंडातही चंद्रकांत ठाकरे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी बियाणे उपलब्ध करून सूर्यफूल लागवडीचा निर्णय घेतला. ठाकरे वाणिज्य पदवीधर असून विद्यमान सरपंच आहेत. त्यांच्यासह गावातील तरुण शेतकरी दिनेश राजेंद्र सोळुंके, सुभाष मोहन सोळुंके, रवींद्र विनायक धवडे आदी अभ्यासू शेतकरी पुढे आले. आणि सुरू झाली सूर्यफूल शेती..शेती व्यवस्थापन (प्रातिनिधिक)बियाणे, निविष्ठा शेतकरी एकत्र खरेदी करतात. मळणी यंत्राचाही सामुहिक वापर.लागवड- जानेवारी किंवा फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा. त्यामुळे मुबलक सूर्यप्रकाश मिळतो.परागीभवनासाठी मधमाश्या आकर्षित होतात. रोग-किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी राहतो.वाण गुणधर्म- ११५ ते १२० दिवसांत येणारे, उशिरा पक्व होणारे वाण. मोठे व बहिर्गोल आकाराचे, मध्य भागापर्यंत दाणे गच्च भरणारे फूल, तेलाचे उत्तम प्रमाण, अधिक उत्पादन क्षमता.बियाणे वापर- एकरी दीड किलो..पारंपरिक पद्धतीत श्रम व खर्च अधिक व्हायचे. यावर उपाय म्हणून टोकण पद्धतीने लागवड करून पाणी दिल्याने मजुरी आणि वेळेची मोठी बचत झाली.लावणीचे अंतर- दोन ओळींत २४ इंच, दोन झाडांत ९ ते १० इंच.काहींनी सुरुवातीला ठिबक सिंचन केले होते. मात्र शेवाळ साचून चोकअप झाले. सध्या प्रवाही पद्धतीनेच सिंचन.एकूण हंगामात सुमारे पाचवेळा पाणी. दर १० दिवसांच्या अंतराने.पेरणी झाल्यानंतर त्वरित पेंडिमिथॅलिन या उगवणपूर्व तणनाशकाचा वापर.सुरुवातीच्या काळात अळी नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा वापर..Cotton Productivity: विशेष कापूस प्रकल्पातून वाढली उत्पादकता .पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी. त्यातून उत्पादनात वाढ मिळते. अतिरिक्त फुटवे हाताने काढले जातात.नियोजनपूर्वक काढणी व यांत्रिकीकरण वापरून मळणीपीक १०५ ते ११० दिवसांत काढणीस तयार होते.सूर्यफूल पाठीमागील बाजूने पिवळी-तपकिरी झाल्यानंतर कापणी करून खळ्यावर २- ३ दिवस चांगले वाळवून घेण्यात येते. मजूरटंचाईवर पर्याय म्हणून पाचोरा (जळगाव) येथून थ्रेशर यंत्र मागवले जाते. त्याद्वारे न फुटता दाणे स्वच्छपणे भुश्शापासून वेगळे होतात. नुकसान होत नाही. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत यांत्रिक मळणी अतिशय वेगाने होते. यंत्राची गती योग्य राखल्याने दाणे फुटण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे शेतकरी सांगतात..पूर्वी या भागात गहू, बाजरी, मका आदी एकदल पिके वारंवार घेत असत. परंतु सततच्या एकाच प्रकारच्या पिकांमुळे जमिनीचा पोत कमी होत चालला होता. त्या अनुषंगाने सूर्यफूल हा हुकमी पर्याय मिळाला आहे. सूर्यफूल कापणीनंतर उर्वरित झाडाचा भाग शेतातच राहतो. त्याचे अवशेष शेताला खत म्हणून गाडण्यात येतात..अर्थकारणअजंदेच्या गाळपेरा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सूर्यफुलाने बदलले आहे. त्यांच्यासाठी पाचोरा (जि. जळगाव) ही मुख्य बाजारपेठ आहे.चार वर्षांतील सरासरी दर (प्रति क्विंटल)वर्ष दर (रुपये)२०२३ ४,०००२०२४ ४,५००२०२५ ५,०००२०२६ ६,१००.उत्पादन खर्च- १२ हजार रुपयांपर्यंत. बियाणे किंमत- प्रति किलो एक हजार रुपये.उन्हाळी बाजरीत उत्पन्न कमी व खर्च जास्त व्हायचा. त्या तुलनेत सूर्यफुलातून दुप्पट फायदा.अजंदे गाव- सूर्यफूल शेतीसूर्यफूल उत्पादक संख्या- १५ ते २०सूर्यफूल क्षेत्र- ५० एकरांच्या आसपासपूर्वीचे उत्पादन एकरी ४ क्विंटलच्या दरम्यानआजचे उत्पादन- ९ ते १० क्विंटल..मी चार ते साडेचार एकरांत दरवर्षी सूर्यफूल घेतो. आखाती देशातील युद्धजन्य व एकूणच परिस्थिती पाहता यंदा सूर्यफूल तेलाला मागणी वाढली आहे. यंदा कधी नव्हे तो सूर्यफुलाला ६५६५ रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी दर मिळाला आहे.चंद्रकांत ठाकरे, ९२८४७९३६०३.कमी पाणी, कमी खर्च, कमी मजुरांमध्ये येणारे सूर्यफूल हे उत्तम पर्यायी पीक आहे. माझ्या अन्य क्षेत्रांवरही फेरपालट म्हणून त्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस आहे.दिनेश सोळुंके, ९५११२४००९७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.