राहुल रसाळ यांच्या व्यावसायिक पीकपद्धतीतील टोमॅटो हे महत्त्वाचे पीक आहे. ते सांगतात की पावसाळी हंगामात या पिकात जिवाणूजन्य करपा, अर्ली व लेट ब्लाइट आदी रोग उद्भवतात. अनेक शेतकरी या हंगामात हे पीक टाळतात. अशावेळी ज्ञान, अनुभव व तंत्रज्ञान पणास लावून बिगरहंगामात पीक यशस्वी करण्याची किंवा ज्या कालावधीत माल पिकविणे शेतकऱ्यांना शक्य नसते तो शोधून त्या वेळी लागवड करण्याची हातोटी आम्ही साधली आहे. टोमॅटो लागवड व्यवस्थापन- ठळक बाबी २० ते २५ ऑगस्टपासून प्लॉट सुरू झाला पाहिजे असे लागवड नियोजन. जेणे करून मार्केटमधील टोमॅटो संपले की आपले हार्वेस्टिंग सुरू होते. (सुमारे १५ ते २० जून दरम्यान लागवड. जूनपासून सहा महिने प्लॉट चालतो.) सुमारे १४ ते १५ दिवस टिकवणक्षमता असलेल्या खासगी कंपनीच्या वाणाचा वापर सात वर्षांपासून. या वाणाची वैशिष्ट्ये
अन्य बाबी
तज्ज्ञांचे विवेचन मृद् व अन्नद्रव्ये विषय शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर म्हणतात, की राज्य खत समितीने जमिनींचे प्रकार, पिके व त्यांच्या विविध अवस्थांनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या ११ ग्रेड्स तयार केल्या आहेत. माती परीक्षण अहवाल तपासून त्यानुसार वापर करावा. काटेकोर पद्धतीने माती, पाणी, अन्नद्रव्ये व कीडनाशके यांचा वापर करून उत्पादन खर्चात बचत करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदाशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे म्हणतात, की क्षार, सामू व चुनखडीचे प्रमाण या तीन मुख्य गोष्टींमुळे जमिनीची नाडी आपल्याला समजते. जमीन, पाणी व हवा यांचा सूक्ष्म अभ्यास हवा. त्यामुळे समस्या कमी करता येतील. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणेही गरजेचे आहे. उत्पादन, विक्री
राहुल यांना मिळालेले सन्मान (निवडक)
सदस्य निवड
उल्लेखनीय राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संकेतस्थळावर क्षारयुक्त पाणी समस्येवर मात करून निर्यातक्षम डाळिंब उत्पादन घेण्याविषयीची माहिती प्रसिद्ध. गुणांची शिदोरी आपल्या गुणांचा राहुल यांनी चांगला विकास केला आहे. प्रयोग ‘शेअर’ करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे इतरांना माहिती होण्याबरोबरच काही शेतकरी त्या प्रयोगात स्वकौशल्याची भर घालून अजून नवी निर्मिती करतात. राहुल दरवर्षी शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांचे प्लॉटस पाहतात. नव्या देशांना भेटी आहेतच. जगभरातील संशोधन प्रबंध ते अभ्यासतात. त्यातून नवे संशोधन वापरण्याची दिशा मिळते. लॉकडाउन काळात ३५ ते ४० वेबिनार्समध्ये त्यांनी सहभाग घेतला. आता विविध प्रशिक्षण कार्यक्रमांत ते मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावतात. रासायनिक अवशेष कमी करण्यासाठी राहुल यांच्या टिप्स १ ) सूक्ष्मजीवांवर आधारित घटकांचा अधिकाधिक वापर केल्याने रासायनिक अंश कमी होण्यास मदत होते या संकल्पनेवर राहुल काम करतात. सूर्यप्रकाशामुळेही अवशेषांचे विघटन होते. त्यामुळे बागेत द्राक्षघड किंवा फळे चारही बाजूंनी सूर्यप्रकाशात कशी येतील याचे नियोजन करतात. ते म्हणतात, की एखाद्या बुरशीनाशकाचा पीएचआय ६६ दिवस आहे. माझ्या भागात त्याचे विघटन ६० ते ६६ दिवसांत होत असेल, तर सूर्यप्रकाश भरपूर असलेल्या भागात (उदा. सांगली, कर्नाटक) भागात त्याचे ५० दिवसांतच विघटन होऊ शकते. कारण सूर्यप्रकाश भरपूर आहे. इक्वेडोरसारख्या देशात तर त्याही कमी दिवसांत विघटन होते. २) शेजारील शेतातील रासायनिक फवारण्यांचे थेंब आपल्या शेतात येऊ नयेत यासाठी शेताच्या बांधाला १२ ते १५ फूट उंच वाढणाऱ्या गवताची लागवड करतात. रसायन उडून आपल्या शेतात आले तर पहिल्यांदा त्या गवतावर पडते. गवताची एक ओळ पुरेशी ठरते. कुंपणाची उंच भिंत तयार होते. ३) क्षेत्र मोठे असल्याने तण काढण्यासाठी मजुरांची टंचाई असते. त्यामुळे ग्लायफोसेटचा वापर होतो. त्याचे तणांवर ‘कव्हरेज’ चांगले होईल याकडे लक्ष देतात. पाणी ‘आरओ’चे असते. ‘स्प्रेडर’ चांगले वापरतात. त्यामुळे परिणाम प्रभावी मिळतो. संपर्क- राहुल रसाळ- ९७६६५५०६२४
मालिका समाप्त.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.