क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध पिकांची शेती व त्यांचे चांगले उत्पादन घेणे आव्हानाचे असते. पुणे जिल्ह्यात मंगरूळ पारगाव येथील कुंडलिक विठ्ठल कुंभार यांनी अभ्यासूवृत्ती व प्रयोगशीलता यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलले. मार्केटचा कल ओळखून उसातील आंतरपिके, बहुविध पीकपद्धती व उत्कृष्ट व्यवस्थापन यातून कुंभार यांनी आपली शेती फायदेशीर, सक्षम व अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक बनवली आहे. पुणे जिल्ह्यातील मंगरूळ पारगाव (ता. जुन्नर) येथील कुंडलिक विठ्ठल कुंभार यांनी आपली ओळख पंचक्रोशीत प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून तयार केली आहे. २००३ पर्यंत त्यांची शेती पारंपरिक होती. अभ्यास वाढवल्याशिवाय शेतीत प्रगती होणार नाही, असे त्यांना वाटले. मग अभ्यासू वृत्ती वाढली, विविध भागातील शेतीच्या पाहणीसह कृषी विभागाच्या अभ्यास दौऱ्यांतही भाग घेतला. प्रयोगशील शेतीची वाटचाल १९७८ साली कुकडी नदीच्या कालव्यातून पाणी आले आणि मंगरूळ पारगाव भागात शेती वाढत गेली. पुढे पाणी, रासायनिक खतांचा असंतुलित वापर झाल्याने जमिनी क्षारयुक्त, चोपण झाल्या. आता या भागात ही मोठी समस्या बनून राहिली आहे. परिसरात उसाचे क्षेत्र अधिक आहे. आपली शेती सुधारण्यासाठी कुंभार यांनी पुणे-मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतले. ऊस व आंतरपीक, बहुविध पीकपद्धती समजावून घेतल्या. त्यातून आदर्श शेती उभी केली. कुंभार यांची आदर्श शेती
एकात्मिक बहुपीक पद्धती
विद्राव्य क्षार, सामूवर नियंत्रण कुंभार पाणी व माती परीक्षण नियमित करतात. जमिनीत चुनखडीचे प्रमाण असून, पाण्यातील विद्राव्य क्षारांचे (टीडीएस) प्रमाण १४०० ते १५०० पर्यंत गेले आहे. सामू साडेआठ ते पावणे नऊच्या आसपास आहे. पाण्यातील क्षार व पीएचचे प्रमाण मोजण्यासाठी टीडीएस मीटर आणि पीएच मीटरचा वापर होतो. ही समस्या दूर करण्यासाठी ‘आरओ’ तंत्रज्ञानाचा वापर होतो. पाण्याचा पीएच कमी करण्यासाठी सायट्रिक ॲसिडचा वापर होतो. क्षार कमी करण्यासाठी ताग, धैंचासारखी हिरवळीची पिके घेतली जातात. रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्यासाठी ठिबक सिंचनासह विद्राव्य खतांवर भर देण्यात येतो. उल्लेखनीय उत्पादन १- परिसरातील उसाचे उत्पादन सरासरी ४० ते ५० टन असताना कुंभार यांनी हे उत्पादन एकरी ८० ते ८५ टनांपर्यंत नेले आहे. एक एकर उसातील कलिंगडाचे २० टन उत्पादन मिळाले. तर मिरचीचे आत्तापर्यंत तीन ते चार टन उत्पादन हाती आले आहे. अजून उत्पादन सुरू आहे. आठ फूट उंच वाढलेल्या उसामुळे मिरचीला नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे फळाची चकाकी व प्रत चांगली आहे. २) बीटरूटमध्ये घेतलेल्या मधुमक्याचे एकरी तीन टन तर सलग अर्धा एकर क्षेत्रात सहा टन उत्पादन मिळाले. सध्या या पिकाला चांगले दर म्हणजे किलोला १२ रुपयांपासून ते २२ रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.
पशुपालनाची जोड
रासायनिक खतांच्या खर्चात बचत
संपर्क- कुंडलिक विठ्ठल कुंभार- ९८९०३२८५५६
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.