
Nashik News : गेल्या सप्ताहापासून तापमानात चढ उतार होत आहे. निफाड कृषी संशोधन केंद्रावर किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. मात्र गुरुवार (ता. ९) रोजी ६.८ अंश सेल्सिअसपर्यंत पाऱ्यात घसरण झाली होती.
आता पुन्हा किमान तापमानात वाढ झाली असून ते १० अंशावर गेले आहे. मात्र दररोज मध्यरात्रीनंतर गारठा वाढत असल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे सकाळी लवकर शेकोट्या पेटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्याच्या किमान तापमानात शुक्रवारी (ता. १०) काहीशी वाढ झाली होऊनही हवेतील गारठा कायम आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर कमी राहील, असा अंदाज आहे.
उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याचे पाहायला मिळाले. वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्वसामान्यांना हुडहुडी भरली. त्यामुळे रात्री ठिकठिकाणी शेकोट्यांभोवती गर्दी झालेली दिसून आली.
पिकांची काळजी घ्यावी...
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या प्राप्त अंदाजानुसार शनिवार (ता. ११) रोजी आकाश ढगाळ होते. गहू पिकावर माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून तो वाढण्याची शक्यता आहे.
तसेच थंडीमुळे द्राक्ष मण्यांची आकार होण्यास अडचणी येत आहेत तसेच टोमॅटो पिकात पाने गोळा होत असल्याचे दिसून येत आहे, असा सल्ला के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे प्रा.तुषार उगले यांनी दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.