
डॉ. रामचंद्र साबळे
Agriculture Weather : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. कमाल व किमान तापमानात थोडी फार घसरण होईल. त्यामुळे हा आठवडा सौम्य थंडीचा व कोरड्या हवामानाचा राहील. ही थंडी गहू, हरभरा, मोहरी, जवस, ज्वारी, ऊस, हळद, आले, सुरण, बटाटा या पिकांच्या वाढीसाठी पोषक राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन हवामान कोरडे राहील.
या आठवड्यात हवामान स्थिर राहील. हवामान बदल जाणवणार नाहीत. सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी असला, तरी प्रखर सूर्यप्रकाश राहील. त्यामुळे पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात राहील. बुधवार ते शुक्रवार ((ता. ८ ते १०) दरम्यान दक्षिण महाराष्ट्रात व दक्षिण कोकणात हवामान ढगाळ राहण्याची शक्य असून त्याचा परिणाम थंडीवर होईल. त्यामुळे पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः आंबा मोहरावरील तुडतुड्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत आज (ता.५) अल्पशा प्रमाणात हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम-मध्य व पूर्व विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रात आग्नेयेकडून राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण सौम्य राहून हवामान कोरडे राहील.
पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान प्रशांत महासागराच्या पेरूजवळ १८ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव कमी होईल. तसेच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस व हिंदी महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्यामुळे मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत.
कोकण :
कमाल तापमान पालघर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील.
आज (ता.५) सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अल्पसे ढगाळ राहील. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३८ ते ४५ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३० ते ३३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत २१ ते २६ टक्के, तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत १६ ते १८ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र :
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक व धुळे जिल्ह्यांत ताशी ६ कि.मी., तर जळगाव जिल्ह्यात ताशी ७ कि.मी. आणि नंदुरबार जिल्ह्यात ताशी ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील.
मराठवाडा :
धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. तर नांदेड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड व बीड जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३४ टक्के राहील. त्यामुळे
सकाळी हवामान थंड व कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ १५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान उष्ण व अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत ताशी १० ते १२ कि.मी., तर परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी ९ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
पश्चिम विदर्भ :
कमाल तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३१ टक्के, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यात ३२ ते ३४ टक्के इतकी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात ताशी ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
मध्य विदर्भ :
कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. सकाळी हवामान थंड राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ३५ टक्के, तर नागपूर जिल्ह्यात ३६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात १७ टक्के राहील. हवामान दुपारी अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
पूर्व विदर्भ :
कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर गोंदिया जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस आणि गडचिरोली जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे हवामान सकाळी थंड राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांत ३८ ते ३९ टक्के, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ४१ ते ४२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गोंदिया जिल्ह्यात केवळ १३ टक्के, गडचिरोली जिल्ह्यात १५ टक्के, तर भंडारा जिल्ह्यात १६ टक्के आणि चंद्रपूर जिल्ह्यात १८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र :
कमाल तापमान सातारा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सांगली, पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात आज (ता.५) आकाश अंशतः ढगाळ, तर सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ४७ टक्के, तर सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३४ ते ३५ टक्के, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३१ ते ३२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत २० टक्के, तर सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत १५ ते १८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
कृषी सल्ला :
- सुरू उसाची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात करावी.
- गहू, हरभरा पिकांना वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे.
- आंबा मोहराचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावयाचा असल्यास, परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून फवारणीचे नियोजन करावे.
- कलिंगड पिकास ठिबक सिंचन पद्धतीने एक दिवसाआड पाणी द्यावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.