Maharashtra Heavy Rain: राज्यात सर्वदूर जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे..आज नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे..Rain Update: कोकणातील चार आणि मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा.तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे..उद्या म्हणजेच शनिवारी कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट इशारा देण्यात आला आहे. .Rain Update: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट; विदर्भात उघडीप राहणार ? .तर नंदुरबार, ठाणे, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तसेच सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरींचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..मॉन्सूनचा आस सध्या जैसलमेर, उदयपूर, इंदूर, पश्चिम विदर्भ आणि लगतच्या दक्षिण मध्य प्रदेशावरील कमी दाबाच्या क्षेत्राचे केंद्र, गोपालपूर मार्गे जात असून, पुढे मध्य बंगालच्या उपसागराकडे आग्नेय दिशेने विस्तारलेली आहे..पूर्व विदर्भ आणि लगतच्या पश्चिम-मध्य छत्तीसगडावरील कमी दाबाचे क्षेत्र गेल्या ६ तासांत ताशी १५ किमी वेगाने जवळपास पश्चिम-उत्तरपश्चिम दिशेने सरकले असून, आज सकाळी ८:३० वाजता ते पश्चिम विदर्भ आणि लगतच्या दक्षिण मध्य प्रदेशावर केंद्रित होते. त्याचे केंद्र अमरावतीच्या ५० किमी पूर्व-ईशान्येस, वर्ध्याच्या ६० किमी वायव्येस, बैतूलपासून ९० किमी दक्षिण-आग्नेयेस, खंडवाच्या २१० किमी पूर्व-आग्नेयेस आणि खरगोनच्या २८० किमी पूर्व-आग्नेयेस स्थित आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-उत्तरपश्चिम दिशेने विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेश आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रावरून पुढे सरकण्याची शक्यता असून, पुढील २४ तासांत त्याची तीव्रता कमी होऊन ते सुस्पष्ट कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.