Pune News: बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या प्रणाली पूरक ठरल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. आज (ता. २५) पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निवळून लागले आहे. यातच बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून, दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत आज (ता. २५) नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार असून, किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली तीव्र होणार आहे..गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली. नाशिकच्या सुरगाणा येथे राज्यातील उच्चांकी १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा चटका तापदायक ठरत आहे. वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..राज्यात विंजासह वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने, आज (ता. २५) यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा, तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे..Rain Forecast: पुढील पाच दिवस पाऊस कायम; शुक्रवार आणि शनिवारी जोर वाढणार.पंजाब, हरियाना, दिल्लीतून मॉन्सून परतलानैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर, वायव्य भारतातून माघार घेतली आहे. बुधवारी (ता. २४) संपूर्ण, पंजाब, हरियाना, चंडीगड आणि दिल्लीमधून मॉन्सूनने काढता पाय घेतला. तसेच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. रामपूर, हरिद्वार, मुरदाबाद, बांस्वरा, विद्यानगर, वेरावलपर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा आहे. पुढील दोन दिवसांत गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांतून मॉन्सूनची माघार होण्याची शक्यता आहे..बुधवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---२५.७---२०.९अहिल्यानगर---२५.०---२०.५धुळे---३०.०---१८.८जळगाव---३२.८---निरंकजेऊर---२७.५---१८.०कोल्हापूर---२५.५---२१.२.Maharashtra Rain: कमी दाब क्षेत्रामुळे पुन्हा जोर वाढण्याची शक्यता.महाबळेश्वर---१८.६---१६.४मालेगाव---२९.६---२०.०नाशिक---२३.६---२१.०निफाड---२५.६---२१.२सांगली---२६.७---२०.८सातारा---२५.२---२०.३सोलापूर---२५.९---२१.९सांताक्रूझ---३०.३---२४.०.डहाणू---३१.८---२४.०रत्नागिरी---२८.५---२३.६छत्रपती संभाजीनगर---२९.६---२१.२धाराशिव---२७.३---१९.४परभणी---३२.६---२१.७परभणी (कृषी)---३०.२---२१.२अकोला---३३.६---२४.३अमरावती---३४.२---२१.५भंडारा---३३.०---२२.०.बुलडाणा---३०.५---२१.८ब्रह्मपुरी---३५.२---२४.८चंद्रपूर---३५.०---२४.८गडचिरोली---३३.०---२४.६गोंदिया---३४.१---२४.४नागपूर---३५.०---२४.८वर्धा---३५.४---२४.५वाशीम---३२.६---२१.८यवतमाळ---३३.०---२३.०.जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, वर्धा, नागपूर, भंडारा.विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, परभणी हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, गोंदिया..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.