Soybean Market: सोयाबीनचे वायदे पुन्हा सुरू होणार?

Soybean Rate: मोहरी आणि सोयाबीन या महत्त्वाच्या तेलबियांच्या किमती प्रदीर्घ काळासाठी हमीभावाखाली राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

Goverment : बाजारात किमती ज्या स्तरावर आहेत ते पाहता शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळण्यासाठी बराच काळ किमती वाढण्याची प्रतीक्षा करावी लागेल. तरीही उशिरा का होईना, केंद्राला थोडे शहाणपण आले असे म्हणता येईल.शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करता खरी गरज आहे ती हरभरा वायदे पुन्हा सुरू करण्याची. त्याबरोबरच १७-१८ वर्षांपूर्वी घातलेली तूर वायदे बंदी उठवण्याची. कारण पुढील काळात कडधान्य मंदीमुळे त्यांचे होणारे नुकसान भरून काढायचे तर आताच्या घडीला असलेल्या चढ्या भावात त्यांचे येणारे खरीप उत्पादन अगोदरच कमोडिटी एक्स्चेंजवर विकण्याची संधी त्यांना मिळेल.जर शेतकऱ्यांचेच कल्याण करायचे आहे तर बाजार चढे असताना वायद्यांची उपलब्धता असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर निवडून आलेल्या नवीन लोकप्रतिनिधींनी आणि शेतकरी नेत्यांनी याबाबतीत आवाज उठवण्याची गरज आहे. किमती तळाला असताना वायदे चालू केल्यास त्याचा फायदा केवळ प्रक्रियादारांनाच होत असतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com