Legal benefits of a will: मृत्युपत्र कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असते, जर ते सक्षम आणि स्वतःच्या इच्छेने तयार केले गेले असेल. भारतात हे भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५ अंतर्गत तयार करता येते. ते हस्तलिखित किंवा टंकलिखित दोन्ही स्वरूपात असू शकते.
ज्याच्यावर मालमत्तेची निर्विवाद मालकी आहे आणि जो मानसिकदृष्ट्या सुदृढ आहे, तो कोणीही मृत्युपत्र तयार करू शकतो. जबरदस्तीने किंवा फसवून तयार करण्यात आलेले मृत्युपत्र वैध ठरत नाही. व्यक्ती अनेक वेळा मृत्युपत्र बदलू शकते, मात्र शेवटचे तयार केलेले आणि वैध मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते.
मृत्युपत्र का करावे?
मालमत्तेचे विना-विवाद वितरण करता येते. अल्पवयीन मुलांचे संगोपन कुणी करावे याचा उल्लेख करता येतो. कुटुंबातील वाद टाळता येतो. धर्मादाय संस्थेला दान देण्याची मुभा असते. पारदर्शक मालमत्ता हस्तांतरण शक्य होते.
मृत्युपत्र लिहिताना लक्षात ठेवायच्या बाबी:
व्यक्तिगत माहिती – नाव, वय, पत्ता, जन्मतारीख.
मालमत्तेची यादी – स्थावर, जंगम, म्युच्युअल फंड, बँक खाती, इ.
लाभार्थी माहिती – नाव, वय, पत्ता, नातेसंबंध.
साक्षीदार – दोन साक्षीदार असावेत आणि त्यांनीही स्वाक्षरी करावी.
तारीख व ठिकाण – स्वाक्षरी करताना नमूद करावे.
शारीरिक व मानसिक आरोग्याचे प्रमाणपत्र – वाद टाळण्यासाठी उपयुक्त.
नोंदणी आवश्यक आहे का?
मृत्युपत्राची नोंदणी कायद्याने बंधनकारक नाही. पण नोंदणी केल्यास ती अधिक मजबूत, विश्वासार्ह आणि न्यायालयात कमी वादग्रस्त ठरते. दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्यास त्याची प्रत उपलब्ध होते.
जर मृत्युपत्र नसेल तर?
मालमत्तेचे वितरण वारसा कायद्यानुसार होते. कुटुंबीयांमध्ये वाद होण्याची शक्यता वाढते. इच्छा व्यक्त न झाल्यामुळे अनेक अनिश्चितता निर्माण होतात. याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.