Farmer: शेतकऱ्यांना पीएम किसानमधून दिला जाणारा निधी तुटपुंजा असल्याचं जाणकार सांगतात. त्यामुळं योजनेच्या निधीत वाढ करण्याची सूचना करण्यात आली होती. पण त्याला मात्र अर्थमंत्र्यांनी केराची टोपली दाखवली. केंद्र सरकारनं २ फेब्रुवारी २०१९ रोजी पीएम किसान योजना सुरू केली. या योजनेतून वर्षाला तीन टप्प्यात ६ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. केंद्र सरकार या योजनेचा उदोउदो करत असतं. लोकसभा निवडणुकांच्या आधी अंतरिम अर्थसंकल्पातही या योजनेच्या लाभार्थीवर जोर देण्यात आला होता. खरं म्हणजे २०१९ साली लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू केल्याचं जाणकार सांगतात. या योजनेचा लाभ भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झाला होता. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र शेतकऱ्यांनी दणका दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.