Guarantee Act: इंडिया आघाडीचं सरकार आलं की, हमीभाव कायदा करू: राहुल गांधी

Monsoon Session: शेतकरी नेत्यांना संसद परिसरात येऊन दिलं जात नव्हतं. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले गेले.

Rahul Gandhi: हमीभाव कायद्यासोबत राहुल गांधी यांनी शेतमालाचे भाव आणि जमीन धारणा आणि कृषी कायद्यावरून सरकारला धारेवर धरलं. यावेळी राहुल यांनी महाभारतातील चक्रव्युहाचं उदाहरण दिलं. आणि देशाला आजच्या काळात सहा लोकांनी चक्रव्युहमध्ये अडकवलं आहे. ते सहा लोक म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल, अदानी आणि अंबानी आहेत, असा आरोपही केला. त्यामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांनाही अडकवलं आहे, असंही राहुल म्हणाले. त्यावरुन संसदेत एकच गोंधळ उडाला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला.  त्यावर अदानी अंबानीचं नाव न घेण्याची वरून सूचना आली असावी. मी नाव न घेता ए१ आणि ए२ असा उल्लेख करतो, असं म्हणत रिजिजू यांना टोलाही लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com