Guarantee Act: सरकारने हमीभावाबाबत समिती स्थापन केली, पण हमीभाव कायद्याचं काय झालं?

Narendra Modi: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार मागील दहा वर्षापासून हमीभाव ठरवताना उत्पादन खर्चावर ५० टक्के ए२ चं सूत्र वापरतं. हेच सूत्र डॉ. मनमोहनसिंग सरकारच्याही काळात वापरलं जात होतं.

Shivraj Singh chouhan: कृषिमंत्री चौहान यांनी स्वामिनाथन आयोगावरून तर कॉँग्रेसवर फायरिंग केलं. पण त्याच वेळी उत्तराच्या शेवटी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही सांगितलं.म्हणजे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा वायदा करणारे पंतप्रधान मोदी मात्र मागील दोन वर्षात शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नावर ब्र सुद्धा उचारत नाहीत. इकडे कृषीमंत्री चौहान मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न मोदींच्या नेतृत्वाखालीच येत्या काळात दुप्पट करण्याचं स्वप्न दाखवतायत. लोकसभेत दोन दिवस विरोधकां सत्ताधाऱ्यांना शेतीच्या प्रश्नांवरून शिंगावर घेतलं होतं. आता राज्यसभेत शुक्रवारी विरोधी पक्षानं सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हमीभाव कायद्यावर अडून राहण्याचे एकप्रकारे संकेत दिलेत, एवढं नक्की. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com