Assembly Election: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार कर्जमाफी करण्याची शक्यता

Farmer Loan: शेतीचे चाक सध्या कर्जाच्या खाईत रुतलं आहे. कर्जमाफी केल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत. पण अर्थसंकल्पात कर्जमाफी झाली नाही.

Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत सरकारला शेतकऱ्यांनी चांगलाच इंगा दाखवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. त्यातच सरकारमुळे अनेक शेतीमालाचे भाव पडले होते. निर्यातबंदी, खुली आयात, स्टाॅक लिमिट अशा धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये विशेष नाराजी आहे. विशेष म्हणजे शेतकरी कर्जबाजारी होण्याला सरकारची ही धोरणेही काही प्रमाणात जबाबदार आहेत. त्यामुळे सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. हे ओळखून सरकारला शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी कर्जमाफी करावी लागेल, असे शेतीप्रश्नाच्या अभ्यासकांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com