Drought : राज्यात पाणी टंचाईचं संकट भीषण

Water Shortage: राज्यातील २ हजार ९३४ गावं आणि ६ हजार ५३९ वाड्यांवर ३ हजार ६२२ टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. ही आकडेवारी पाणी पुरवठा विभागानं दिलेलीय.

Drought crisis: दुष्काळाचा प्रश्न नव्यानं निर्माण झालाय अशातला भाग नाही. मूळ प्रश्न सिंचन सुविधांचा आहे. त्यावर सरकारनं काम करणं अपेक्षित आहे. पण ते बाजूला सारून वरवरच्या मलमपट्टीत कोणत्याही सरकारला अधिक स्वारस्य असतं. कारण दुष्काळ आला की, टँकर, चारा छावण्या यातून बक्कळ माल छापून हात धुवून घेता येतात, अशी धारणाही राजकीय व्यवस्थेत मुरलेलीय. त्यामुळं सिंचनाच्या मूळ समस्यांवर तोडगा माहित असूनही त्यावर मलमपट्टी करण्यावरच अधिक भर दिला जातो. त्यामुळं दुष्काळ वरवर पाहता निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम वाटत असला तरी राजकीय व्यवस्थेच्या कोडगेपणाचा परिपाकय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com