पहिला पाऊस पडल्यावर कुळवाची एक पाळी देऊन उताराला आडवी रानाची बांधणी करून सारे तयार करावेत. जेणेकरून पावसाचं पाणी या साऱ्यात जास्तीत जास्त मुरले जाईल. या साऱ्याचा आकार साधारण ६ बाय ६ मीटर इतका ठेवावा. याशिवाय जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण वाढविण्यासाठी चार मीटर अंतरावर साधारणपणे ६० सेंटीमीटर खोलीचे चर खोदून ठेवल्यास त्याचाही चांगला उपयोग होतो. या उपायांमुळे कोरडवाहू रब्बी ज्वारीच्या उत्पादनात हेक्टरी ४ क्विंटल पेक्षा जास्त वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जमिनीत पाणी मुरविण्यासाठी दोन समपातळी बांधाच्या मधल्या जागेत दोन सजीव बांध घालून जमिनीचा उतार कमी करता येतो. यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मातीची धूपही कमी होते. असे सजीव बांध करण्यासाठी सुबाभूळ सारख्या वनस्पतीचा उपयोग करता येतो. अशी लागवड पावसाळ्यात करता यावी म्हणून पूर्वमशागत करताना समपातळीत सरी वरंबा करून सजीव बांधाची मार्गदर्शक रेषा ठरवून ठेवावी. शेतातून पावसाचं जास्तीचं वाहून जाणारं पाणी लवणाच्या जागी शेततळी खोदून अडवून ठेवण्याची योजनाही पूर्वमशागत करताना अमलात आणावी. या पाण्याचा पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी उपयोग होतो. याशिवाय नाला सरळीकरण, नाल्यातील प्रवाहाला दगडाचे अडथळे करणं ही कामेही करणे हिताच ठरत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.