Pikvima Yojana: पीकविमा भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ नाही

Maharashtra Goverment: राज्य शासनाने मागील वर्षापासून शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विमा सुरु केला. म्हणजेच शेतकऱ्यांचा विमा हप्ताही राज्य सरकार भरत आहे.

Farmer: मागच्या वर्षी या सर्व टप्प्यांमधून शेतकऱ्यांना विक्रमी ७ हजार १४९ कोटी रुपये विमा भरपाई मिळाली. यापैकी ४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. उरलेले लवकरच मिळणार आहेत. यंदाही आपल्यासाठी पीकविमा खूपच गरजेचा आहे. कारण यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. त्यातच ऑगस्टनंतर ला निना परिस्थितीमुळे चांगला पावसाचा अंदाज आहे. म्हणजेच आपली खरिपातील पीकं काढणीच्या काळातच पाऊस वाढण्याची शक्यता आहे. या काळात आपली मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस पिकाची काढणी सुरु होते. त्यामुळे या पिकांचे नुकसान होऊ शकते. नुकसान झाल्यास विमा भरपाई मिळून आपल्याला आर्थिक आधार मिळेल. त्यासाठी विमा अर्ज भरावा लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com