Farmer ID Update: कृषीच्या सर्व योजनांसाठी आता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य

कृषी विभागाच्या योजनांसाठी १५ एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या ओळख क्रमांकाशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. मग नेमका शेतकऱ्यांना कोणत्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं, याचीच माहिती आपण आजच्या द अॅग्रोवन शोमधून घेणार आहोत.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी अॅग्रीस्टॅक प्रकल्प राबवला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा, कर्जमाफी, अनुदान, पीक कर्ज, पीएम किसान, हमीभाव आदि योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी, असंही आवाहन कृषी विभागाने केलं आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com