भारत आणि पाकिस्तान या दोन देशात १९६० साली सिंधु पाणी करार झाला. या करारावेळी मध्यस्थी केली ती जागतिक बँकेने. या करारावर स्वाक्षरी केली भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती आयुब खान यांनी. या करारानुसार, भारताला सतलज, रावी आणि बियास या नद्यांचं पाणी वापरण्याचा अधिकार देण्यात आला. तर पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी वापरण्याचा अधिकार दिला गेला. सिंधु, झेलम आणि चिनाब भारतातून वाहत पाकिस्तानात जाणाऱ्या नद्या आहेत. त्यावर पाकिस्तानची शेती, ऊर्जा ही क्षेत्र अवलंबून आहेत. १९६० पासून भारत या कराराचं पालन करत आला आहे. परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मात्र सिंधु पाणी वाटप करार भारताने स्थगित केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानची कोंडी होऊ शकते, असा दावा केला जातोय. एकप्रकारे वॉटर डिप्लोमसीचा वापर करून पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.