Kharif Crop Management: पावसाचं आगमन १६ जुलै ते ३१ जुलैदरम्यान झाल्यास कोणती पिके घ्याल?

Monsoon Crop: पावसाचे आगमन १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, कापूस या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, तीळ या पिकाबरोबर एरंडी अधिक धने (१:१), एरंडी अधिक तूर ही आंतरपिके घ्यावीत.

Kharif Season: पावसाचे आगमन १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, कापूस, रागी, तीळ या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, या पिकांबरोबर एरंडी अधिक धने (१:१), एरंडी अधिक तूरही आंतरपिके घ्यावीत. संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, कापूस, रागी, तीळ ही पिके घेऊ नयेत.सोयाबीन आणि कापूस लागवडीशिवाय इतर पर्याय उपलब्ध नसल्यास उशिरात उशिरा २२ जुलैपर्यंत लागवड करावी. त्यानंतर लागवड करू नये, कारण उत्पादनात मोठी घट येते.अजूनही अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने घाबरून न जाता पेरणीयोग्य पाऊस होण्याची म्हणजे ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस होण्याची वाट पाहावी. प्रत्येक पिकासाठी दिलेल्या कालावधीनुसार पिकाची पेरणी करावी. सर्वसाधारण परिस्थिती तसेच उशिरा पेरणीसाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com