Drought: सहा वर्षात ७ कोटी हेक्टरवरचे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Government: सरकार थातुरमातूर मदत देऊन तोंडाला पानं पुसतं. पण शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरून मिळत नाही. विशेष म्हणजे हे दरवर्षी घडत असतं. सरकार शेतकऱ्यांना मदत तर करत नाही उलट शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी धोरण आखते.

Crop Loss: विशेषतः रब्बी पिकांवर उष्णतेचा जास्त परिणाम होत असतो. मागच्या दोन वर्षांपासून गहू पिकाचे उष्णतेमुळे नुकसान होत आहे. पिकांचे नुकसान अलीकडच्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा सरकारकडून असते. पण सरकारी धोरणांचाही फटका कमी बाजारभावाच्या रुपात शेतकऱ्यांना बसतच असतो. या संकटांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ग्रामिण अर्थव्यवस्था शेतीवर म्हणजेच पीक उत्पादनावर अवलंबून आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असल्याने ग्रामिण अर्थव्यवस्थेवरच संकट येत आहे. या कारणांमुळे ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com