Crop Insurance: पीकविम्याची भरपाई कमी मिळणार असल्याने शेतकऱ्यांची पाठ

crop loss compensation: "एक रुपयात पीक विमा" योजना बंद केल्यानंतर शेतकऱ्यांकडून विमा अर्ज कमी प्रमाणात भरले जात आहेत. सरकारकडून अप्रत्यक्षपणे असा संकेत दिला जात आहे की, आता फक्त खरे शेतकरीच विमा घेत आहेत. मात्र वास्तव वेगळे आहे; शेतकरी या योजनेपासून दूर गेलेत कारण एक रुपयात विमा योजना रद्द होण्यासोबतच, यंदा चार ट्रिगर पॉइंट्स काढल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. त्यामुळे यंदा या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

crop protection scheme: खरिप २०२३ पासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे विमा अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि परिणामी केंद्र व राज्य सरकारच्या हप्त्यावरचा खर्चही वाढला. सध्या योजनेनुसार, शेतकऱ्यांना खरिपासाठी २%, रब्बीसाठी १.५% आणि नगदी पिकांसाठी ५% हप्ता भरावा लागतो. पण, जेव्हा सरकारने शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात विमा दिला, तेव्हा त्यांच्या हप्त्याची जबाबदारी सरकारवर पडली. विशेष बाब म्हणजे, ही एक रुपयातील योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून आलेली नव्हती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com